spot_img
ब्रेकिंग...तर राजकारणातून संन्यास घेईल! मंत्री विखे पाटील यांचे खासदार राऊत यांना उत्तर

…तर राजकारणातून संन्यास घेईल! मंत्री विखे पाटील यांचे खासदार राऊत यांना उत्तर

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
महानंदची गोरेगाव येथील ५० एकर मोयाच्या ठिकाणची जागा अदानी यांना विकण्याचा डाव असल्याचा आरोप शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी पशुसंर्वधन व दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर केला होता. त्याला पालकमंत्री विखे पाटील यांनी उत्तर दिले असून राऊत यांनी हा आरोप सिद्ध करून दाखविला तर राजकारणातून संन्यास घेऊल. अन्यथा राऊत यांच्याविरूद्ध न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे, अशी प्रतिक्रिया विखे पाटील यांनी व्यक्त केली.

विखे पाटील यांनी नगरमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधला, ते म्हणाले, मी वारंवार सांगत आलेलो आहे खासदार संजय राऊत यांच्या डोयावर परिणाम झाला आहे. ते जी मुक्ताफळे उधळत आहेत, खरेतर त्यांना मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे. ते कोणत्या ५० एकर जमिनीचे आरोप करत आहेत, हे त्यांनाच माहिती. मी आत्तापर्यंत पुष्कळ सहन केले तसेच काही पथ्य देखील पाळत आलो आहे. परंतु ते महानंदबाबत बेताल वक्तव्य करत असेल तर त्यांनी त्याचे परिणाम भोगायला तयार राहावे.

त्यांनी व्यक्तिगत जीवनात काय केले, कोणाचे घर फोडले, हे मलाही सांगावे लागेल. तुम्ही ५० एकरचा दावा करत आहे, तो सिद्ध करावा. सिद्ध न केल्यास त्याचे परिणाम भोगायला तयार राहा. पण त्यांनी जर आरोप सिद्ध केले तर मी राजकारणातून संन्यास घेईल, असेही विखे म्हणाले.

खासदार राऊत यांना खरेच तुम्ही लोकांनी (पत्रकार) गांभीर्याने घेऊ नका. हे सुपारीबहाद्दर लोक आहेत. मी जर अशी उपमा वापरली की, हे पिसाळलेल्या कुत्र्यासारखे बोलतात, तर हे सर्वात जास्त होईल. त्यामुळे हे म्हणण्याची विरोधकांनी आमच्यावर वेळ आणू नये. राऊत यांच्या डोयावर परिणाम झाला असून त्यांच्याविरुद्ध आता अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे. त्यांनी आरोप सिद्ध केल्यास राजकारणातून संन्यास घेईल, असा इशारा त्यांनी दिला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

एकनाथराव, ‘कांदा’ कृषीचा की उद्योग मंत्रालयाचा?

पूतना मावशीचे प्रेम थांबवा| सल्लागार बदला अन् ढोकणेंऐवजी दिलीप वळसे पाटलांकडून मंचरच्या कांदा केंद्राची...

नगरच्या एसटी विभागाला मिळणार गिफ्ट? विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ यांचा विश्वास…

पारनेर। नगर सहयाद्री:- एसटी महामंडळाच्या नगर विभागासाठी २०० ई-बसची मागणी करण्यात आली आहे. दिवाळीपर्यंत या...

मातोश्रीचा आदेश आल्यास विधानसभा लढणार: पारनेरमध्ये कोणी थोपटले दंड, नेमकं काय म्हणाले पहा…

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम पारनेर |नगर सहयाद्री:- शिवसेना पक्ष तळागाळात पोहोचवण्यासाठी आम्ही...

शेतकरी संकटात! लष्करी अळी जोमात, मका पीक कोमात..

अप्पा चव्हाण। श्रीगोंदा:- दीड महिन्यापासून पेरणी केलेल्या खरिपातील पिकांना गत पंधरवड्यात झालेल्या पावसाने...