spot_img
ब्रेकिंगकोण कोणामुळे निवडून आले? उपमुख्यमंत्री अजित पवार स्पष्टच म्हणाले, निवडून येणार्‍याला..

कोण कोणामुळे निवडून आले? उपमुख्यमंत्री अजित पवार स्पष्टच म्हणाले, निवडून येणार्‍याला..

spot_img

पुणे। नगर सहयाद्री-
राष्ट्रवादीचे नेत्या सुप्रिया सुळे व शिरूरचे खा. अमोल कोल्हे हे दोघे अजित पवारांमुळे निवडून आल्याची चर्चा सध्या गाजत आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता, निवडून येणार्‍याला माहितीय कोण कोणामुळे निवडून आले अन् निवडून आणणार्‍यालाही माहितीय कोण कोणामुळे निवडून आले, असे सांगत त्यांनी यावर अधिक बोलण्यास नकार दिला.

अभियांत्रिकी महाविद्यालयाची पाहणी केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. पवार म्हणाले, राज्य मागासवर्गीय आयोग हे स्वायत्त आहे आणि त्यांच्यावर कुठलाही दबाव नाही. आम्ही हस्तक्षेप करत नाही. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी श्रीराम मांसाहारी होते, असे विधान केले होते. त्यावर बोलण्यास त्यांनी नकार दिला.

‘अजित पवार पक्षात असताना दमदाटी करत होते’ या आव्हाड यांच्या वक्तव्यावर पवार म्हणाले, मी कामाचा माणूस आहे. सकाळी सहाला कामाला सुरूवात करतो. मी असले आलतू-फालतू उत्तरं द्यायला बांधील नाही. किरकोळ किरकोळ प्रश्न ज्याला काही अर्थ नाही, दोन दिवस चघळायचे-चघळायचे अन त्याचा चोथा करायचा.

राज्यात कोविड वाढू नये म्हणून खबरदारी घेण्यात आली आहे. याशिवाय नागरिकांनी पण प्रतिसाद दिला पाहिजे. मागील वेळेस सगळ्यांनी कर्तव्य बजावत सहकार्य केले होते. आताच्या कोविडमध्ये तीव्रता फार नाही. आम्ही अजून मास्क वापरायला सुरुवात केली नाही. आम्ही पण मास्क वापरला पाहिजे ते सत्य आहे, असेही एका प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

एकनाथराव, ‘कांदा’ कृषीचा की उद्योग मंत्रालयाचा?

पूतना मावशीचे प्रेम थांबवा| सल्लागार बदला अन् ढोकणेंऐवजी दिलीप वळसे पाटलांकडून मंचरच्या कांदा केंद्राची...

नगरच्या एसटी विभागाला मिळणार गिफ्ट? विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ यांचा विश्वास…

पारनेर। नगर सहयाद्री:- एसटी महामंडळाच्या नगर विभागासाठी २०० ई-बसची मागणी करण्यात आली आहे. दिवाळीपर्यंत या...

मातोश्रीचा आदेश आल्यास विधानसभा लढणार: पारनेरमध्ये कोणी थोपटले दंड, नेमकं काय म्हणाले पहा…

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम पारनेर |नगर सहयाद्री:- शिवसेना पक्ष तळागाळात पोहोचवण्यासाठी आम्ही...

शेतकरी संकटात! लष्करी अळी जोमात, मका पीक कोमात..

अप्पा चव्हाण। श्रीगोंदा:- दीड महिन्यापासून पेरणी केलेल्या खरिपातील पिकांना गत पंधरवड्यात झालेल्या पावसाने...