spot_img
ब्रेकिंगनगर अर्बन घोटाळा प्रकरणी दोन संचालकांना पोलीस कोठडी

नगर अर्बन घोटाळा प्रकरणी दोन संचालकांना पोलीस कोठडी

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : नगर अर्बन घाेटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगात फिरवायला सुरवात केली आहे. पोलिसांनी तत्कालीन संचालक मनेष साठे व अनिल काेठारी यांंना अटक केली होती. या दोघांनाही 2 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

पुढील तपासासाठी पोलीस कस्टडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले असल्याची माहिती मिळाली आहे. नगर अर्बन बँकेतील २८ संशयित कर्ज प्रकरणात फसवणूक व १५० कोटींचा घोटाळाबाबत कोतवालीत गुन्हा दाखल आहे. बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी फिर्याद दिली होती.

आर्थिक गुन्हे शाखा याचा तपास करत आहेत. बँकेमधील सर्व कर्ज प्रकरणांचे फॉरेन्सिक ऑडिट झाले असून त्याचा अहवालही मागील महिन्यात आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आलेला आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने याआधीच दोघांना अटक केली आहेच, ते न्यायालयीन कोठडीत आहेत. आता मनेष साठे व अनिल काेठारी या संचालकांना ताब्यात घेतले होते. त्यांना पोलीस कस्टडी मिळाली आहे. पोलिसांनी आता तत्कालीन संचालकांना ताब्यात घेण्यास सुरूवात केली असल्याने इतर संचालकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून काही संचालक परार झाले असून अनेकांचे फोन स्विच ऑफ झाले आहेत अशी चर्चा सध्या कानावर येत आहे.

दरम्यान पोलिसांकडून कारवाई सुरु झाल्याने ठेवीदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आता आगामी काळात न्याय मिळेल अशी भावना ठेवीदार व्यक्त करत आहेत. हा तपास आता कोणत्या वळणावर जातो? आणखी कुणी यामध्ये अडकते का? आणखी संचालक अटक होतील का? हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

एकनाथराव, ‘कांदा’ कृषीचा की उद्योग मंत्रालयाचा?

पूतना मावशीचे प्रेम थांबवा| सल्लागार बदला अन् ढोकणेंऐवजी दिलीप वळसे पाटलांकडून मंचरच्या कांदा केंद्राची...

नगरच्या एसटी विभागाला मिळणार गिफ्ट? विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ यांचा विश्वास…

पारनेर। नगर सहयाद्री:- एसटी महामंडळाच्या नगर विभागासाठी २०० ई-बसची मागणी करण्यात आली आहे. दिवाळीपर्यंत या...

मातोश्रीचा आदेश आल्यास विधानसभा लढणार: पारनेरमध्ये कोणी थोपटले दंड, नेमकं काय म्हणाले पहा…

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम पारनेर |नगर सहयाद्री:- शिवसेना पक्ष तळागाळात पोहोचवण्यासाठी आम्ही...

शेतकरी संकटात! लष्करी अळी जोमात, मका पीक कोमात..

अप्पा चव्हाण। श्रीगोंदा:- दीड महिन्यापासून पेरणी केलेल्या खरिपातील पिकांना गत पंधरवड्यात झालेल्या पावसाने...