spot_img
महाराष्ट्रभीषण अपघात ! परीक्षेला चाललेल्या तीन भावा बहिणीला चिरडले

भीषण अपघात ! परीक्षेला चाललेल्या तीन भावा बहिणीला चिरडले

spot_img

छत्रपती संभाजीनगर / नगर सह्याद्री
परीक्षेला चाललेल्या तीन भावंडांना ट्रकने चिरडल्याची घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील बीड बायपास परिसरातल्या बाळापूर फाट्यावर ही घटना घडली. ही धडक इतकी जोरदार होती की दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एक बहीण व दोघे भावांचा समावेश होता.

प्रवीण अंभोरे, प्रतिभा अंभोरे आणि लखन अंभोरे अशी मृतांची नावे असून ते परभणी जिल्ह्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सातारा परिसरातील शिवछत्रपतीनगर भागात ते मागील काही दिवसांपासून राहत होते.

प्राथमिक माहितीनुसार, आज (दि.८) सकाळी दहा वाजता बीड बायपासवरील बाळापूर फाटा परिसरात हे तिघे चालले होते. याचवेळी दोन हायवा एकमेकांना ओव्हरटेक करत होत्या. याच नादात एका हायवा चालकाने दुचाकीला जोराची धडक दिल्याने व थेट अंगावरून हायवा गेल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर हायवा चालक घटनास्थळावरून गाडीसह फरार झाला.

मृत झालेले तिघेही बहीण-भाऊ साधारण वीस ते पंचवीस वर्षे असतील असा अंदाज आहे. घटनास्थळी वन विभागाच्या परीक्षेचे हॉलतिकीट आढळून आल्याने ते परीक्षा देण्यासाठी जात होते असा अंदाज वर्तवला आहे. घटनेनंतर माहिती समजताच स्थानिक नागरिकांनी धाव घेत गर्दी केली. माहिती समजताच चिकलठाणा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून हायवा ट्रकचा शोध सुरु केला होता. घटनास्थळाची भयावह स्थिती पाहून नागरिकांमधून अत्यंत शोक व्यक्त केला जात होता. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत असून तपासाअंती अधिक माहिती समोर येईल.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

एकनाथराव, ‘कांदा’ कृषीचा की उद्योग मंत्रालयाचा?

पूतना मावशीचे प्रेम थांबवा| सल्लागार बदला अन् ढोकणेंऐवजी दिलीप वळसे पाटलांकडून मंचरच्या कांदा केंद्राची...

नगरच्या एसटी विभागाला मिळणार गिफ्ट? विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ यांचा विश्वास…

पारनेर। नगर सहयाद्री:- एसटी महामंडळाच्या नगर विभागासाठी २०० ई-बसची मागणी करण्यात आली आहे. दिवाळीपर्यंत या...

मातोश्रीचा आदेश आल्यास विधानसभा लढणार: पारनेरमध्ये कोणी थोपटले दंड, नेमकं काय म्हणाले पहा…

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम पारनेर |नगर सहयाद्री:- शिवसेना पक्ष तळागाळात पोहोचवण्यासाठी आम्ही...

शेतकरी संकटात! लष्करी अळी जोमात, मका पीक कोमात..

अप्पा चव्हाण। श्रीगोंदा:- दीड महिन्यापासून पेरणी केलेल्या खरिपातील पिकांना गत पंधरवड्यात झालेल्या पावसाने...