spot_img
राजकारणमी मुख्यमंत्री झालो की, त्यानंतर मग.. संभाजीराजेंच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण

मी मुख्यमंत्री झालो की, त्यानंतर मग.. संभाजीराजेंच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण

spot_img

नगर सह्याद्री टीम : मागील काही महिन्यांपासून राजकरणात अनेक चढ उतार आपण पाहतोय. तसेच अनेक राजकीय नेत्यांचे मुख्यमंत्री पदाबाबतचे बॅनरही पाहतोय. अनेक लोक सध्या मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक आहेत. परंतु आता सध्या संभाजीराजे छत्रपती यांच्या एका व्यक्तव्याने राजकीय चर्चाना उधाण आले आहे.

राज्यात मराठा आरक्षणासह धनगर आरक्षण, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे. यातच अनेकविध मुद्द्यांवरून राज्यात आंदोलने सुरू आहेत. सारथीच्या प्रश्नांसंदर्भात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलक विद्यार्थ्यांची भेट संभाजीराजे यांनी घेतली.

यावेळी विद्यार्थ्यांनी विविध मागण्या व समस्या मांडल्या. यानंतर संभाजीराजेंनी घेतलेली सारथी आंदोलकांच्या भेटीदरम्यान केलेले वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे.

आंदोलकांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती करताच, मला मुख्यमंत्री करा, चुटकीत प्रश्न सोडवतो, असे विधान संभाजीराजे यांनी केले. संभाजीराजे यांनी केलेल्या या विधानामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत संभाजीराजे यांनी पहिल्यांदा विधान केलेले नाही.

यापूर्वीही मुख्यमंत्री होण्याची इच्छा संभाजीराजे यांनी बोलून दाखवली आहे. दरम्यान, या आंदोलनाला संभाजीराजे यांनी भेट देऊन दिवाळीत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यावेळी आमचे प्रश्न सुटले, तर आम्ही आंदोलन मागे घेऊ, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरच्या एसटी विभागाला मिळणार गिफ्ट? विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ यांचा विश्वास…

पारनेर। नगर सहयाद्री:- एसटी महामंडळाच्या नगर विभागासाठी २०० ई-बसची मागणी करण्यात आली आहे. दिवाळीपर्यंत या...

मातोश्रीचा आदेश आल्यास विधानसभा लढणार: पारनेरमध्ये कोणी थोपटले दंड, नेमकं काय म्हणाले पहा…

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम पारनेर |नगर सहयाद्री:- शिवसेना पक्ष तळागाळात पोहोचवण्यासाठी आम्ही...

शेतकरी संकटात! लष्करी अळी जोमात, मका पीक कोमात..

अप्पा चव्हाण। श्रीगोंदा:- दीड महिन्यापासून पेरणी केलेल्या खरिपातील पिकांना गत पंधरवड्यात झालेल्या पावसाने...

पुणे, कोल्हापूरच्या पार्श्वभूमीवर नगरमध्ये आ. जगताप अलर्ट; आयुक्तांना पत्र देत तातडीने केली ‘ही’ मागणी

अहमदनगर / नगर सह्याद्री - गेल्या काही दिवसांपासून पुणे, मुंंबई, कोल्हापूर येथे पावसामुळे पूर...