spot_img
देशआंघोळ, शौचायलाची व्यवस्था काय होती? पोट भरण्यासाठी काय केलं? बोगद्यात अडकलेल्या कामगारांचा...

आंघोळ, शौचायलाची व्यवस्था काय होती? पोट भरण्यासाठी काय केलं? बोगद्यात अडकलेल्या कामगारांचा असा होता थरार

spot_img

नगर सह्याद्री टीम : उत्तराखंडमधल्या सिलक्यारा बोगद्यात ४१ कामगार अडकले होते. तब्बल १७ दिवसांनंतर त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. संपूर्ण देश त्यांच्यासाठी प्रार्थना करत होता. त्यांना वाचवणारी टीम अहोरात्र प्रयत्न करत होती.

अखेर त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. यास सर्वाना उपचारासाठी दिल्लीच्या AIIMS रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. सर्व कामगारांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलय. पण या सतरा दिवसात कामगारांनी बोगद्यात काय केलं, त्यांचा दिनक्रम कसा होता? आंघोळ, शौचालयाची व्यवस्था कशी केली होती? आदी प्रश्न अनेकांना पडले आहेत. चला जाणून घेऊयात..

‘असा’ असायचा दिनक्रम
12 नोव्हेंबरला कामगार बोगद्यात काम करत असताना मोठा आवाज झाला आणि ढिगारा कोसळला. कामगारांनी पळण्याचा प्रयत्न केला पण ढिगाऱ्यामुळे सर्व रस्तेच बंद झाल्याने ते अडकले. सुरुवातीला आपण फार काळ जीवंत राहाणार नाही अशी मनात भीती त्यांच्या मनात आली, परंतु त्यांनी एकमेकांना धीर देत, 24 तास एकमेकांचे हात पकडून वेळ ढकलली. तोपर्यंत बाहेर कामगार अडकल्याची माहिती पसरली आणि कामगारांच्या बचावकार्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले.

13 नोव्हेंबरला कामगारांना इलाचीयुक्त तांदूळ पुरवण्यात आले. जेव्हा पहिल्यांदा तांदूळ मिळाले तेव्हा विश्वास वाढला की आमचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. पण वेळ घालवणं कठिण जाऊ लागलं. त्यातील एक जण सांगतो की, मोबाईल फोन होते, त्यावर ल्यूडो खेळू लागलो.

पण मोबाईलचं नेटवर्क नसल्याने बाहेर कोणाशी संपर्क होऊ शकत नव्हता. शौचालयासाठी बोगद्याच्या कोपऱ्यात खड्डा करण्यात आला होता असंही तो म्हणाला. मनोरंजनासाठी पत्ते आणि मोबाईल फोनवर ल्यूडो खेळायचो असं ओराव यांनी सांगितलं. सुदैवाने बोगद्यात पाण्याचा एक नैसर्गिक स्त्रोत होता.

त्यावरच पिण्याच्या आणि आंघोळीची व्यवस्था करण्यात आली होती. एका पाईपच्या माध्यमातून त्यांना जेवण पुरवण्यात आलं असा त्यांचे १७ दिवस दिनचर्या होती.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरच्या एसटी विभागाला मिळणार गिफ्ट? विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ यांनी केली पाहणी

पारनेर। नगर सहयाद्री:- एसटी महामंडळाच्या नगर विभागासाठी २०० ई-बसची मागणी करण्यात आली आहे. दिवाळीपर्यंत या...

मातोश्रीचा आदेश आल्यास विधानसभा लढणार: डॉ. श्रीकांत पठारे

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम पारनेर |नगर सहयाद्री:- शिवसेना पक्ष तळागाळात पोहोचवण्यासाठी आम्ही...

शेतकरी संकटात! लष्करी अळी जोमात, मका पीक कोमात..

अप्पा चव्हाण। श्रीगोंदा:- दीड महिन्यापासून पेरणी केलेल्या खरिपातील पिकांना गत पंधरवड्यात झालेल्या पावसाने...

पुणे, कोल्हापूरच्या पार्श्वभूमीवर नगरमध्ये आ. जगताप अलर्ट; आयुक्तांना पत्र देत तातडीने केली ‘ही’ मागणी

अहमदनगर / नगर सह्याद्री - गेल्या काही दिवसांपासून पुणे, मुंंबई, कोल्हापूर येथे पावसामुळे पूर...