spot_img
ब्रेकिंगपावसाची प्रतिक्षा लांबणीवर!

पावसाची प्रतिक्षा लांबणीवर!

spot_img

मुंबई | नगर सह्याद्री
आता संपूर्ण देशाला मान्सूनची प्रतिक्षा लागली आहे. मान्सूनने केरळमध्ये धडक दिल्याने तो लागलीच महाराष्ट्रात सरींचा सांगावा घेऊन येईल, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. उकाड्यापासून एकदाची सूटका होईल असा अंदाज होता. पण मुंबईकरांच्या आनंदावर विरजण पडले आहे. मुंबईकरांची पावसाची प्रतिक्षा लांबणीवर पडली आहे. मुंबईत मान्सून जूनच्या दुसर्‍या आठवड्यात दाखल होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

ठाणे आणि आसपासच्या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेची शयता असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला आहे. प्रादेशिक हवामान विभागाने पुढील काही दिवस उष्ण वातावरणाची शयता वर्तवली आहे. पावसाळा जवळ येत असल्याने मुंबई हवेतील आर्द्रता वाढली आहे. घामाचा धारा लागल्या आहेत. त्यामुळे मुंबईकरांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.

पाणी जास्त प्या, टोपी घाला , उन्हाच्या कडायात फार फिरु राहू नका असा सल्ला डॉटरांनी दिला आहे. मुंबईकरांची पावसाची प्रतिक्षा लांबणीवर पडली आहे. मुंबईत मान्सून जूनच्या दुसर्‍या आठवड्यात दाखल होणार आहे. आजचा दिवसही डोयाला ताप वाढवणारा असेल. तापमान ३६ अंशापर्यंत राहील तर आर्द्रताही ६० टक्क्यांहून जास्त असेल, असा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्याला, बूधवारपर्यंत उष्ण आणि दमट वातावरणाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

एकनाथराव, ‘कांदा’ कृषीचा की उद्योग मंत्रालयाचा?

पूतना मावशीचे प्रेम थांबवा| सल्लागार बदला अन् ढोकणेंऐवजी दिलीप वळसे पाटलांकडून मंचरच्या कांदा केंद्राची...

नगरच्या एसटी विभागाला मिळणार गिफ्ट? विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ यांचा विश्वास…

पारनेर। नगर सहयाद्री:- एसटी महामंडळाच्या नगर विभागासाठी २०० ई-बसची मागणी करण्यात आली आहे. दिवाळीपर्यंत या...

मातोश्रीचा आदेश आल्यास विधानसभा लढणार: पारनेरमध्ये कोणी थोपटले दंड, नेमकं काय म्हणाले पहा…

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम पारनेर |नगर सहयाद्री:- शिवसेना पक्ष तळागाळात पोहोचवण्यासाठी आम्ही...

शेतकरी संकटात! लष्करी अळी जोमात, मका पीक कोमात..

अप्पा चव्हाण। श्रीगोंदा:- दीड महिन्यापासून पेरणी केलेल्या खरिपातील पिकांना गत पंधरवड्यात झालेल्या पावसाने...