spot_img
अहमदनगरAhmednagar News Today: सावधान! नगरमध्ये आढळले तीन कोरोना रुग्ण

Ahmednagar News Today: सावधान! नगरमध्ये आढळले तीन कोरोना रुग्ण

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. एवढे दिवस आपल्या गावाबाहेर असलेला कोरोना आता आपल्या गावात पोचला आहे. शासकीय नोंदीनुसार राज्यात रविवारी आढळलेल्या १३१ रूग्णांपैकी तीन रूग्ण नगर जिल्ह्यातील आहेत.

महाराष्ट्रात सध्या कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. रविवारी राज्यात तब्बल १३१ नवीन कोरोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. त्यापैकी नगर जिल्ह्यात तीन रुग्ण आढळले आहेत.

कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. नाताळ आणि नववर्षामुळे पर्यटन स्थळावर गर्दी वाढली. त्यामुळे पुढील काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शयता आरोग्य विभागाने वर्तवली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रविवारी राज्यात तब्बल १३१ नवीन कोरोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यात तीन रुग्ण आढळले आहेत.२०२२ जानेवारीमध्ये कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेयरियंटने धुमाकूळ घातला होता. जगभरात कोरोनाची तिसरी लाट आली होती. कोरोना विषाणू म्यूटेशनमुळे नवे व्हेरियंट येत आहेत.

सध्या आलेल्या जेएन१ या कोरोना सब व्हेरियंटसाठी लसीकरणाची गरज नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. दरम्यान, नगर जिल्ह्यात तीन कोरोना बाधित आढळले असले तरी ते कोणत्या परिसरातील आहेत, याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

एकनाथराव, ‘कांदा’ कृषीचा की उद्योग मंत्रालयाचा?

पूतना मावशीचे प्रेम थांबवा| सल्लागार बदला अन् ढोकणेंऐवजी दिलीप वळसे पाटलांकडून मंचरच्या कांदा केंद्राची...

नगरच्या एसटी विभागाला मिळणार गिफ्ट? विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ यांचा विश्वास…

पारनेर। नगर सहयाद्री:- एसटी महामंडळाच्या नगर विभागासाठी २०० ई-बसची मागणी करण्यात आली आहे. दिवाळीपर्यंत या...

मातोश्रीचा आदेश आल्यास विधानसभा लढणार: पारनेरमध्ये कोणी थोपटले दंड, नेमकं काय म्हणाले पहा…

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम पारनेर |नगर सहयाद्री:- शिवसेना पक्ष तळागाळात पोहोचवण्यासाठी आम्ही...

शेतकरी संकटात! लष्करी अळी जोमात, मका पीक कोमात..

अप्पा चव्हाण। श्रीगोंदा:- दीड महिन्यापासून पेरणी केलेल्या खरिपातील पिकांना गत पंधरवड्यात झालेल्या पावसाने...