spot_img
ब्रेकिंगUdhav Thackeray News: तो प्रश्न....? "उगाच हरभर्‍याच्या झाडावर ...." उद्धव ठाकरे यांनी...

Udhav Thackeray News: तो प्रश्न….? “उगाच हरभर्‍याच्या झाडावर ….” उद्धव ठाकरे यांनी दिलं उत्तर

spot_img

नवी दिल्ली-

Udhav Thackeray News: इंडिया आघाडीचा चेहरा म्हणून तुम्ही स्वतःकडे कसे पाहता, असे विचारले असता ‘उबाठा’ नेते उद्धव ठाकरे यांनी ‘मला हरभर्‍याच्या झाडावर चढवू नका. माझ्यासमोर कोणतीच स्वप्ने नाहीत’ असे त्यांनी सांगितले.

उबाठाचे उद्धव ठाकरे सध्या इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी दिल्लीमध्ये आहेत. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, इंडिया आघाडीचा समन्वयक, चेहरा ठरवण्याची वेळ आली आहे. बैठकीमध्ये याबाबत चर्चा होईल. पंतप्रधान पदाचा चेहरा नाही पण निमंत्रक कोणीतरी असावा. सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी चेहरा हवा. अरविंद केजरीवाल हे नाराज नाहीत. त्यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. जनता जे ठरवेल ते आम्ही करु.

उगाच अकलेचे तारे तोडण्यात काही अर्थ नाही. सगळ्यांशी बोलू. सगळेजण देशातील लोकशाही टिकविण्यासाठी एकत्र आले आहेत. मी देखील काही नावे सूचवणार आहे. मी मुख्यमंत्री पद जबाबदारी म्हणून स्वीकारावे लागले. माझ्यासमोर देशाची, महाराष्ट्राची जनता आहे. जनतेला काय हवे, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

घोडा मैदान जवळ आले आहे. सर्व सैनिक जमा झाले आहेत. त्यामुळे पुढे जाण्यासाठी एक चेहरा आवश्यक आहे. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. देशाची लोकशाही हाच आमचा स्वार्थ आहे. त्यांचे काय करायचे ते त्यांनी करावे. जसे मध्य प्रदेशात शिवराज बदलले तसे मोदींना पण बदलू शकतात.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

एकनाथराव, ‘कांदा’ कृषीचा की उद्योग मंत्रालयाचा?

पूतना मावशीचे प्रेम थांबवा| सल्लागार बदला अन् ढोकणेंऐवजी दिलीप वळसे पाटलांकडून मंचरच्या कांदा केंद्राची...

नगरच्या एसटी विभागाला मिळणार गिफ्ट? विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ यांचा विश्वास…

पारनेर। नगर सहयाद्री:- एसटी महामंडळाच्या नगर विभागासाठी २०० ई-बसची मागणी करण्यात आली आहे. दिवाळीपर्यंत या...

मातोश्रीचा आदेश आल्यास विधानसभा लढणार: पारनेरमध्ये कोणी थोपटले दंड, नेमकं काय म्हणाले पहा…

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम पारनेर |नगर सहयाद्री:- शिवसेना पक्ष तळागाळात पोहोचवण्यासाठी आम्ही...

शेतकरी संकटात! लष्करी अळी जोमात, मका पीक कोमात..

अप्पा चव्हाण। श्रीगोंदा:- दीड महिन्यापासून पेरणी केलेल्या खरिपातील पिकांना गत पंधरवड्यात झालेल्या पावसाने...