spot_img
राजकारणराजकीय घडामोडींना वेग ! चार आमदारांचे फोन बंद, मोठ्या घडामोडींची शक्यता

राजकीय घडामोडींना वेग ! चार आमदारांचे फोन बंद, मोठ्या घडामोडींची शक्यता

spot_img

झारखंड / नगर सह्याद्री : जमीन घोटाळ्याप्रकरणी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यांनी काल मुख्यमंत्रिदपदाचा राजिनामा दिल्यानंतर अनेक घडामोडींना वेग आला आहे. चंपई सोरेन यांनी काल राज्यपालांची भेट घेतली. त्यांनीही मंख्यमंत्रीपदावर दावा केला आहे. तर दुसरीकडे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी गटातील चार आमदारांचे फोन बंद असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

बिहारनंतर आता झारखंडमध्येही राजकीय खेळ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर सत्ताधारी पक्षाला आमदारांकडून घोडे बाजाराची भीती वाटत आहे. दरम्यान, चंपई सोरेन यांना अद्याप राजभवनकडून सरकार स्थापनेचे निमंत्रण मिळालेले नाही.

तर चंपई सोरेन यांनी ४३ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राजभवनाला पाठवले आहे. तर सत्ताधारी पक्षाच्या चार आमदारांचे फोन बंद आहेत. राजकीय उलथापालथीच्या भीतीने सुमारे ३५ आमदारांना हैदराबाद किंवा बंगळुरूला पाठवण्याची तयारी सुरू असून, त्यासाठी दोन चार्टर विमाने तयार आहेत.

हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर झारखंडमधील राजकीय उलथापालथीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. झारखंड मुक्ती मोर्चाचे ज्येष्ठ नेते आणि हेमंत सोरेन यांचे निकटवर्तीय चंपई सोरेन यांच्या मुख्यमंत्रिपदाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जेएमएमने चंपई सोरेन यांना राज्याचे पुढील मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय घेतला होता. हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर चंपई यांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला आहे. हेमंत सोरेन यांनी बुधवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर ईडीने त्यांना जमीन घोटाळ्याप्रकरणी अटक केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरच्या एसटी विभागाला मिळणार गिफ्ट? विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ यांचा विश्वास…

पारनेर। नगर सहयाद्री:- एसटी महामंडळाच्या नगर विभागासाठी २०० ई-बसची मागणी करण्यात आली आहे. दिवाळीपर्यंत या...

मातोश्रीचा आदेश आल्यास विधानसभा लढणार: पारनेरमध्ये कोणी थोपटले दंड, नेमकं काय म्हणाले पहा…

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम पारनेर |नगर सहयाद्री:- शिवसेना पक्ष तळागाळात पोहोचवण्यासाठी आम्ही...

शेतकरी संकटात! लष्करी अळी जोमात, मका पीक कोमात..

अप्पा चव्हाण। श्रीगोंदा:- दीड महिन्यापासून पेरणी केलेल्या खरिपातील पिकांना गत पंधरवड्यात झालेल्या पावसाने...

पुणे, कोल्हापूरच्या पार्श्वभूमीवर नगरमध्ये आ. जगताप अलर्ट; आयुक्तांना पत्र देत तातडीने केली ‘ही’ मागणी

अहमदनगर / नगर सह्याद्री - गेल्या काही दिवसांपासून पुणे, मुंंबई, कोल्हापूर येथे पावसामुळे पूर...