spot_img
महाराष्ट्र'शरद पवार लवकरच भाजपसोबत जाणार' , राजकीय चर्चाना उधाण

‘शरद पवार लवकरच भाजपसोबत जाणार’ , राजकीय चर्चाना उधाण

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री :
महाराष्ट्रातील राजकारण सध्या विविध रंग घेताना दिसत आहे. मध्यंतरी शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये झालेले बंड याने राजकारणात मोती उलथापालथ झाली. अजित पवार हे भाजपसोबत गेल्याने अनेक चर्चांना उधाण आले. परंतु आता अजित पवार यांच्यामागोमाग शरद पवार देखील भाजपला पाठिंबा देतील असा मोठा गौप्यस्फोट आमदार रवी राणा यांनी केला आहे.

अजित पवार शरद पवार भेट :
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शरद पवारांशी प्रतापराव पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भेट झाली. यावेळी दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. त्यानंतर ते लगेच दिल्लीला गेले. तेथे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यामुळे या भेटीने चर्चाना उधाण आलं आहे.

शरद पवार भाजपसोबत जाणार का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. अशातच आमदार रवी राणा यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत यावं यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रयत्नशील असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

काँग्रेसचे नेते मोदीना पाठींबा देतील :
पुढे बोलताना राणा म्हणाले की, आगामी काळात काँग्रेसचे अनेक नेते मोदीना पाठींबा देतील. तसेच विरोधी पक्षात कमी लोक राहतील, असेही आमदार रवी राणा यांनी म्हटले आहे. राणा यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून शरद पवार काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

एकनाथराव, ‘कांदा’ कृषीचा की उद्योग मंत्रालयाचा?

पूतना मावशीचे प्रेम थांबवा| सल्लागार बदला अन् ढोकणेंऐवजी दिलीप वळसे पाटलांकडून मंचरच्या कांदा केंद्राची...

नगरच्या एसटी विभागाला मिळणार गिफ्ट? विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ यांचा विश्वास…

पारनेर। नगर सहयाद्री:- एसटी महामंडळाच्या नगर विभागासाठी २०० ई-बसची मागणी करण्यात आली आहे. दिवाळीपर्यंत या...

मातोश्रीचा आदेश आल्यास विधानसभा लढणार: पारनेरमध्ये कोणी थोपटले दंड, नेमकं काय म्हणाले पहा…

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम पारनेर |नगर सहयाद्री:- शिवसेना पक्ष तळागाळात पोहोचवण्यासाठी आम्ही...

शेतकरी संकटात! लष्करी अळी जोमात, मका पीक कोमात..

अप्पा चव्हाण। श्रीगोंदा:- दीड महिन्यापासून पेरणी केलेल्या खरिपातील पिकांना गत पंधरवड्यात झालेल्या पावसाने...