spot_img
अहमदनगरपेपरला गेली अन घरी आलीच नाही! बारावीच्या मुलीसोबत नेमकं घडलं काय?

पेपरला गेली अन घरी आलीच नाही! बारावीच्या मुलीसोबत नेमकं घडलं काय?

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री-
बारावीचे पेपर देण्यासाठी गेलेली मुलगी घरी परत आली नाही. नातेवाईक, मैत्रिणीकडे शोध घेतला असता ती मिळून न आल्याने तिच्या वडिलांनी सोमवारी (दि. २६) दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी नगर तालुयातील एका गावात राहतात. त्यांची मुलगी नगर शहरातील एका विद्यालयात बारावीच्या वर्गात शिक्षण घेते. सध्या तिचे बारावीचे पेपर सुरू आहे. ती शुक्रवारी (दि. २३) घरून पेपर देण्यासाठी विद्यालयात आली होती. दरम्यान पेपरला दोन दिवस सुट्टी असल्याने मैत्रिणीकडे वसतिगृहात अभ्यास करण्यासाठी थांबले असल्याचे तिने फिर्यादीला सांगितले.

दरम्यान सोमवारी होणार्‍या पेपरसाठी ती आली नाही. नातेवाईक, मैत्रिणीकडे चौकशी केली असता ती मिळून आली नाही. तिच्याकडील मोबाईल बंद येत असल्याने फिर्यादी यांनी तोफखाना पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून मुलीचा शोध सुरू केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

एकनाथराव, ‘कांदा’ कृषीचा की उद्योग मंत्रालयाचा?

पूतना मावशीचे प्रेम थांबवा| सल्लागार बदला अन् ढोकणेंऐवजी दिलीप वळसे पाटलांकडून मंचरच्या कांदा केंद्राची...

नगरच्या एसटी विभागाला मिळणार गिफ्ट? विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ यांचा विश्वास…

पारनेर। नगर सहयाद्री:- एसटी महामंडळाच्या नगर विभागासाठी २०० ई-बसची मागणी करण्यात आली आहे. दिवाळीपर्यंत या...

मातोश्रीचा आदेश आल्यास विधानसभा लढणार: पारनेरमध्ये कोणी थोपटले दंड, नेमकं काय म्हणाले पहा…

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम पारनेर |नगर सहयाद्री:- शिवसेना पक्ष तळागाळात पोहोचवण्यासाठी आम्ही...

शेतकरी संकटात! लष्करी अळी जोमात, मका पीक कोमात..

अप्पा चव्हाण। श्रीगोंदा:- दीड महिन्यापासून पेरणी केलेल्या खरिपातील पिकांना गत पंधरवड्यात झालेल्या पावसाने...