spot_img
महाराष्ट्रपंकजा मुंडे-मनोज जरांगे एकाच स्टेजवर, मुंडेंनी ‘ओबीसीत आपले स्वागत’ असे म्हणताच 'अशी'...

पंकजा मुंडे-मनोज जरांगे एकाच स्टेजवर, मुंडेंनी ‘ओबीसीत आपले स्वागत’ असे म्हणताच ‘अशी’ होती जरांगेंची प्रतिक्रिया…

spot_img

माजलगाव / नगर सह्याद्री : मनोज जरांगे यांनी आरक्षणासाठी मोठा लढा दिला. त्यांना यात यशही मिळाले. यानंतर अनेक ओबीसी नेत्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. दरम्यान आता एका विवाह सोहळ्यात माजी मंत्री पंकजा मुंडे आणि मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील एकत्र आले हाेते.

माजी मंत्री आरोग्य मंत्री राजेश टोपे, मनोज जरांगे, पंकजा मुंडे यांची शेजारी शेजारी बसण्याची व्यवस्था केली होती. यावेळी पंकजा मुंडे यांनी जरांगे यांचे ‘आपला ओबीसीत समावेश झाला असून तुमचे स्वागत आहे,’ अशा पद्धतीने स्वागत केले.

प्रथमच पंकजा मुंडे आणि जरांगे समोरासमोर आल्याने त्यांच्यात कोणता संवाद होईल अशी सर्वांना उत्सुकता लागलेली होती. मुंडे आणि जरांगे या दोन नेत्यांची पहिली भेट कशी होणार, दोघांत काय संवाद होणार याकडे सर्वांचे लक्ष होते. ‘ओबीसीत स्वागत आहे’ असे पंकजा यांनी जरांगे यांचे स्वागत करताच उपस्थित नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. जरांगे पाटील यांनीही स्मितहास्य करत दाद दिली.

मराठा-ओबीसीत वितुष्ट करणाऱ्यांना आळा बसेल
माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी अध्यादेश निघताच सकारात्मक प्रतिक्रिया दिली होती. त्या म्हणाल्या , गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्र अत्यंत तणावपूर्ण वातावरणातून जात आहे. मराठा आणि ओबीसी समाजात वितुष्ट आणू पाहताय त्या प्रवृत्तींना आपल्याला आळा घातला पाहिजे. यात संयमाची भूमिका घेण्याचा मी वेळोवेळी प्रयत्न केला. सरकारने अध्यादेश काढलाय. सर्वसंमतीने अध्यादेश निघालेला असावा असे त्या म्हणाल्या.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

एकनाथराव, ‘कांदा’ कृषीचा की उद्योग मंत्रालयाचा?

पूतना मावशीचे प्रेम थांबवा| सल्लागार बदला अन् ढोकणेंऐवजी दिलीप वळसे पाटलांकडून मंचरच्या कांदा केंद्राची...

नगरच्या एसटी विभागाला मिळणार गिफ्ट? विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ यांचा विश्वास…

पारनेर। नगर सहयाद्री:- एसटी महामंडळाच्या नगर विभागासाठी २०० ई-बसची मागणी करण्यात आली आहे. दिवाळीपर्यंत या...

मातोश्रीचा आदेश आल्यास विधानसभा लढणार: पारनेरमध्ये कोणी थोपटले दंड, नेमकं काय म्हणाले पहा…

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम पारनेर |नगर सहयाद्री:- शिवसेना पक्ष तळागाळात पोहोचवण्यासाठी आम्ही...

शेतकरी संकटात! लष्करी अळी जोमात, मका पीक कोमात..

अप्पा चव्हाण। श्रीगोंदा:- दीड महिन्यापासून पेरणी केलेल्या खरिपातील पिकांना गत पंधरवड्यात झालेल्या पावसाने...