spot_img
अहमदनगरचष्म्यापासून सुटका हवी! ट्राय करा 'या' टिप्स...

चष्म्यापासून सुटका हवी! ट्राय करा ‘या’ टिप्स…

spot_img

नगर सह्याद्री टीम-

सतत मोबाइल पाहत असल्यामुळे अनेकांना चष्मा लागण्याचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. डोळ्याची दृष्टी कमजोर झाल्याने लोक चष्मा वापरतात. चष्मा वापरल्याने स्क्रीन समोर बसल्यानंतर डोळ्यांना त्रास जाणवत नाही. परंतु दिवसभर चष्मा घातल्यामुळे अनेकांना कंटाळा येतो, त्यामुळे  त्याला चष्म्यापासून सुटका हवी असते.

चष्म्यापासून तुम्हाला सुटका हवी असेल तर यासाठी तीन प्रकारची तंत्रे वापरून शस्त्रक्रिया केली जाते. पहिले तंत्र आहे Lenticule Based Procedure या यंत्रामध्ये क्लिअर, स्माईल अशी तंत्रे वापरली जातात. दुसरं तंत्र आहे LASIK, या तंत्रामध्ये लेझरच्या साह्याने लोकांच्या कॉर्नियावर लेंटिक्युल तयार करून ते बाहेर काढण्यास मदत होते. तिसरे तंत्र आहे Phakic IOL, यामध्ये लोकांच्या डोळ्यात नैसर्गिक लेन्सवर एक लेन्स बसवली जाते.

कोणत्याही व्यक्तीच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यापूर्वी त्याच्या डोळ्यांची तपासणी करण्यात येते. तपासणी करताना डोळ्यांचा कोरडेपणा, कॉर्नियाची जाडी, कॉर्नियाची ताकद, रेटिनाची चाचणी  करण्यात येते. तपासणीनंतर रुग्णाच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया होऊ शकते की नाही याची तपासणी केली जाते. डोळ्याच्या स्थितीनुसार कोणते तंत्र वापरायचे याचा निर्णय घेतला जातो.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

एकनाथराव, ‘कांदा’ कृषीचा की उद्योग मंत्रालयाचा?

पूतना मावशीचे प्रेम थांबवा| सल्लागार बदला अन् ढोकणेंऐवजी दिलीप वळसे पाटलांकडून मंचरच्या कांदा केंद्राची...

नगरच्या एसटी विभागाला मिळणार गिफ्ट? विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ यांचा विश्वास…

पारनेर। नगर सहयाद्री:- एसटी महामंडळाच्या नगर विभागासाठी २०० ई-बसची मागणी करण्यात आली आहे. दिवाळीपर्यंत या...

मातोश्रीचा आदेश आल्यास विधानसभा लढणार: पारनेरमध्ये कोणी थोपटले दंड, नेमकं काय म्हणाले पहा…

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम पारनेर |नगर सहयाद्री:- शिवसेना पक्ष तळागाळात पोहोचवण्यासाठी आम्ही...

शेतकरी संकटात! लष्करी अळी जोमात, मका पीक कोमात..

अप्पा चव्हाण। श्रीगोंदा:- दीड महिन्यापासून पेरणी केलेल्या खरिपातील पिकांना गत पंधरवड्यात झालेल्या पावसाने...