spot_img
अहमदनगरशिर्डीच्या जागेचा तिढा सुटला, महाआघाडी, महायुतीकडून 'यांना' मिळाली उमेदवारी

शिर्डीच्या जागेचा तिढा सुटला, महाआघाडी, महायुतीकडून ‘यांना’ मिळाली उमेदवारी

spot_img

शिर्डी | नगर सह्याद्री
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून अनेक मतदारसंघात इंडिया आणि एनडीएचे उमेदवार जाहीर झाले. परंतु राज्यातील अनेक मतदारसंघ असे आहेत, ज्यामध्ये महायुती आणि महाआघाडीमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. त्यात शिर्डी लोकसभा मतदारसंघ देखील आहे.

शिर्डीत महायुतीकडून उमेदवार ठरला नसला तरी तेथे ठाकरे गटाकडून मात्र भाऊसाहेब वाकचौरे यांचे नाव जवळपास फायनल झाले असल्याचे समजते. दरम्यान आता शिर्डीतून पुन्हा एकदा मीच महायुतीचा उमेदवार असेल असे म्हणत खा. सदाशिव लोखंडे यांनी दंड थोटपले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला कामाला लागा असे सांगितले असल्याचे खा. लोखंडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

यावेळी खा. लोखंडे पुढे म्हणाले, दोन्ही निवडणुकीत भरघोस मतांनी मला तुम्ही निवडून आणले आहे. मी शेतकर्‍यांसाठी कामे केले असून २०२३ ला शेतकर्‍यांच्या शेतात पाणी आणू शकलो असे ते म्हणाले. त्याचप्रमाणे केंद्र व राज्याच्या मदतीने १८२ गावांना पाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला असल्याचे ते म्हणाले.

दहा कोटी नाकारणारा पाहिजे की दहा लाख खाणारा?
तुपामध्ये पैसे खाणारा खासदार पाहिजे का? हे जनतेने ठरवायचंय. वाकचौरेंची ३२ वर्ष प्रशासकीय सेवा झाली. माझी ४० वर्ष जनतेत सेवा आहे. दिल्लीतील स्टिक ऑपरेशनमध्ये मी दहा कोटी रुपये नाकारले होते आणि साईबाबा संस्थानच्या घोटाळ्यात त्यांनी दहा लाख खाल्ले. मी त्यांच्यापेक्षा बरा असून लोकांना दहा कोटी नाकारणारा पाहिजे की दहा लाख खाणारा? असा सवाल देखील खासदार लोखंडे यांनी उपस्थित करत वाकचौरेंवर टीका केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरच्या एसटी विभागाला मिळणार गिफ्ट? विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ यांचा विश्वास…

पारनेर। नगर सहयाद्री:- एसटी महामंडळाच्या नगर विभागासाठी २०० ई-बसची मागणी करण्यात आली आहे. दिवाळीपर्यंत या...

मातोश्रीचा आदेश आल्यास विधानसभा लढणार: पारनेरमध्ये कोणी थोपटले दंड, नेमकं काय म्हणाले पहा…

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम पारनेर |नगर सहयाद्री:- शिवसेना पक्ष तळागाळात पोहोचवण्यासाठी आम्ही...

शेतकरी संकटात! लष्करी अळी जोमात, मका पीक कोमात..

अप्पा चव्हाण। श्रीगोंदा:- दीड महिन्यापासून पेरणी केलेल्या खरिपातील पिकांना गत पंधरवड्यात झालेल्या पावसाने...

पुणे, कोल्हापूरच्या पार्श्वभूमीवर नगरमध्ये आ. जगताप अलर्ट; आयुक्तांना पत्र देत तातडीने केली ‘ही’ मागणी

अहमदनगर / नगर सह्याद्री - गेल्या काही दिवसांपासून पुणे, मुंंबई, कोल्हापूर येथे पावसामुळे पूर...