spot_img
देशकेजरीवाल यांच्या अटकेची चर्चा! ईडीच्या सुत्रांनी केला 'असा' दावा

केजरीवाल यांच्या अटकेची चर्चा! ईडीच्या सुत्रांनी केला ‘असा’ दावा

spot_img

नवी दिल्ली
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र ईडीच्या सुत्रांनी ‘सध्या तरी नाही’ असा दावा केला आहे. केजरीवाल यांच्या अटकेबाबत ईडीच्या सूत्रांनी दावा केला आहे की, सध्या त्यांना अटक करण्याची कोणतीही योजना नाही.

ईडी त्यांच्या पत्रांचे पुनरावलोकन करत आहे. त्यानंतर केजरीवाल यांना चौथे समन्स जारी केले जाऊ शकते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित दारू घोटाळ्यात अटक होण्याची भीती असताना ईडी आता त्यांना चौथ्यांदा समन्स पाठवण्याची तयारी करत आहे.

अंमलबजावणी संचालनालयाशी (ईडी) संबंधित उच्च सूत्रांनी सांगितले, की सध्या केजरीवाल यांनी पाठवलेल्या पत्राचा आढावा घेतला जात आहे. यानंतर त्यांना चौथे समन्स पाठवले जाईल. ईडी आज केजरीवाल यांच्या निवासस्थानावर छापे टाकणार असल्याचा दावा हे अफवा असल्याचे म्हटले आहे.

केजरीवाल यांना ३ समन्स बजावून चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलावले होते. मात्र, केजरीवाल अद्याप ईडीसमोर हजर झाले नाहीत. आम आदमी पार्टीचा दावा आहे की, केजरीवाल यांना अटक करण्यासाठी ही प्रक्रिया केली जात आहे. ईडी त्यांना चौकशीच्या बहाण्याने बोलावून अटक करू इच्छित आहे.

जर ईडीला चौकशी करायची असेल तर ते आपले प्रश्न लिहून केजरीवाल यांना देऊ शकतात. बुधवारपासून आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी केजरीवाल यांच्या अटकेची भीती व्यक्त करण्यास सुरुवात केली. ईडी केजरीवाल यांच्या निवासस्थानावर छापा टाकून त्यांना अटक करू शकते, असा दावा आप नेत्यांनी केला होता.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

एकनाथराव, ‘कांदा’ कृषीचा की उद्योग मंत्रालयाचा?

पूतना मावशीचे प्रेम थांबवा| सल्लागार बदला अन् ढोकणेंऐवजी दिलीप वळसे पाटलांकडून मंचरच्या कांदा केंद्राची...

नगरच्या एसटी विभागाला मिळणार गिफ्ट? विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ यांचा विश्वास…

पारनेर। नगर सहयाद्री:- एसटी महामंडळाच्या नगर विभागासाठी २०० ई-बसची मागणी करण्यात आली आहे. दिवाळीपर्यंत या...

मातोश्रीचा आदेश आल्यास विधानसभा लढणार: पारनेरमध्ये कोणी थोपटले दंड, नेमकं काय म्हणाले पहा…

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम पारनेर |नगर सहयाद्री:- शिवसेना पक्ष तळागाळात पोहोचवण्यासाठी आम्ही...

शेतकरी संकटात! लष्करी अळी जोमात, मका पीक कोमात..

अप्पा चव्हाण। श्रीगोंदा:- दीड महिन्यापासून पेरणी केलेल्या खरिपातील पिकांना गत पंधरवड्यात झालेल्या पावसाने...