spot_img
ब्रेकिंगअखेर ठरलं! 'महाविकास' आघाडीचा फॉर्म्युला नेमका कसा? ठाकरे गटाला मिळणार 'ईतक्या' जागा

अखेर ठरलं! ‘महाविकास’ आघाडीचा फॉर्म्युला नेमका कसा? ठाकरे गटाला मिळणार ‘ईतक्या’ जागा

spot_img

Lok Sabha Election 2024: भाजपने राज्यातील २० लोकसभा मतदारसंघातील आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. महायुतीचा फॉर्म्युला ठरला नसल्याने मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही उमेदवाराची अद्याप घोषणा झालेली नाही. मात्र महायुतीचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती आता समोर येत आहेत. तसेच महाविकास आघाडीचाही जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१-१३-४ असा महायुतीचा फॉर्म्युला असणार आहे. यामध्ये भाजप ३१ जागा, शिवसेना शिंदे गट १३ जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) ४ लोकसभेच्या जागा मिळतील, अशी माहिती सूत्रांकडून समजली आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीचा देखील जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, महाविकास आघाडीने दोन फॉर्म्युले ठरवले आहेत. ज्यामध्ये वंचित महाविकास आघाडीसोबत आल्यास आणि सोबत न आल्यास असा विचार करुन हे फॉर्म्युले ठरवण्यात आले आहेत. वंचित महाविकास आघाडीसोबत आल्यास २०-१५-९-४ असा जागावाटपाचा फॉर्म्युला असेल.

ज्यामुळे शिवसेना ठाकरे गट २०, काँग्रेस १५, राष्ट्रवादी ९ आणि वंचित ४ जागा असा फॉर्म्युला असणार आहे. तर वंचित महाविकास आघाडीसोबत न आल्यास २२-१६-१० असा फॉर्म्युला असेल. यामध्ये ठाकरे गटाला २२ जागा, काँग्रेसला १६ जागा आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला १० जागा मिळणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

एकनाथराव, ‘कांदा’ कृषीचा की उद्योग मंत्रालयाचा?

पूतना मावशीचे प्रेम थांबवा| सल्लागार बदला अन् ढोकणेंऐवजी दिलीप वळसे पाटलांकडून मंचरच्या कांदा केंद्राची...

नगरच्या एसटी विभागाला मिळणार गिफ्ट? विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ यांचा विश्वास…

पारनेर। नगर सहयाद्री:- एसटी महामंडळाच्या नगर विभागासाठी २०० ई-बसची मागणी करण्यात आली आहे. दिवाळीपर्यंत या...

मातोश्रीचा आदेश आल्यास विधानसभा लढणार: पारनेरमध्ये कोणी थोपटले दंड, नेमकं काय म्हणाले पहा…

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम पारनेर |नगर सहयाद्री:- शिवसेना पक्ष तळागाळात पोहोचवण्यासाठी आम्ही...

शेतकरी संकटात! लष्करी अळी जोमात, मका पीक कोमात..

अप्पा चव्हाण। श्रीगोंदा:- दीड महिन्यापासून पेरणी केलेल्या खरिपातील पिकांना गत पंधरवड्यात झालेल्या पावसाने...