spot_img
अहमदनगरAhmednagr News : गारपीटग्रस्तांना मिळेना नुकसान भरपाई, महसूल व कृषी विभागाचा हलगर्जीपणा

Ahmednagr News : गारपीटग्रस्तांना मिळेना नुकसान भरपाई, महसूल व कृषी विभागाचा हलगर्जीपणा

spot_img

पारनेर / नगर सह्याद्री : पारनेर तालुक्यातील निघोज मंडळातील काही गावांतील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना दोन महिने झाले तरी नुकसान भरपाई मिळाली नाही. महसूल विभागाच्या गलथान कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.  खात्यावर पैसे वर्ग झाले नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आठ दिवसांत ही मदत न मिळाल्यास तहसीलसमोर आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

पारनेर तालुक्यातील पानोली, वडुले, सिद्वेवरवाडी, सांगवी सूर्या, गांजी भोयरे, जवळा, वडनेर हवेली गटेवाडी, पारनेर येथील शेकडो शेतकऱ्यांचे कांदा, मका, वाटाणा, ऊस, फळबागांसह मोठे नुकसान झाले. तब्बल चार ते साडेचार हजार एकर क्षेत्रावरील पिंकाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. परंतु पंचनामे होऊनही मदत मिळेना. त्यामुळे शेतकरी तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन करणार आहेत.

सरकारने पंचनामे करून शेतकऱ्यांना एकरी नुकसान भरपाई जाहीर केली. काही शेतकऱ्यांना तातडीने पैसे दिले. परंतु अद्यापी अनेक शेतकऱ्यांना वेगवेगळ्या त्रुटी सांगून अजूनपर्यत भरपाई दिली नाही. याबाबत तहसील कार्यालयात चौकशी केली असता, सर्व्हर बंद होते अशी कारणे सांगितली जातात. येत्या १्५ दिवसांत आचारसंहिता लागण्याची शक्यता असून तसे झाल्यावर ही नुकसान भरपाई मिळणार नाही. त्यामुळे ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते नारायण गायकवाड, संतोष खोडदे, अंकुश गायकवाड, बी. ए. भगत यांनी तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला.

तहसीलदारांचे दुर्लक्ष, शेतकरी वाऱ्यावर
तालुक्यात पंचनाम्याप्रमाणे नुकसान भरपाईचे पैसे महसूल विभागाकडे जमा झाले. मात्र, महसूल विभागाच्या ढिम्म कारभारामुळे, तसेच तलाठी मंडलाधिकारी व पंचनाम्यात सहभागी असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या गलथानपणामुळे हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होत नाहीत. याकडे तहसीलदारांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

एकनाथराव, ‘कांदा’ कृषीचा की उद्योग मंत्रालयाचा?

पूतना मावशीचे प्रेम थांबवा| सल्लागार बदला अन् ढोकणेंऐवजी दिलीप वळसे पाटलांकडून मंचरच्या कांदा केंद्राची...

नगरच्या एसटी विभागाला मिळणार गिफ्ट? विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ यांचा विश्वास…

पारनेर। नगर सहयाद्री:- एसटी महामंडळाच्या नगर विभागासाठी २०० ई-बसची मागणी करण्यात आली आहे. दिवाळीपर्यंत या...

मातोश्रीचा आदेश आल्यास विधानसभा लढणार: पारनेरमध्ये कोणी थोपटले दंड, नेमकं काय म्हणाले पहा…

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम पारनेर |नगर सहयाद्री:- शिवसेना पक्ष तळागाळात पोहोचवण्यासाठी आम्ही...

शेतकरी संकटात! लष्करी अळी जोमात, मका पीक कोमात..

अप्पा चव्हाण। श्रीगोंदा:- दीड महिन्यापासून पेरणी केलेल्या खरिपातील पिकांना गत पंधरवड्यात झालेल्या पावसाने...