spot_img
अहमदनगरअहमदनगर : पोलीस पाठलागावर..वाळू वाहतूक करणारी पिकअप विहिरीत कोसळली, चालकासह तीन मजूर...

अहमदनगर : पोलीस पाठलागावर..वाळू वाहतूक करणारी पिकअप विहिरीत कोसळली, चालकासह तीन मजूर…

spot_img

अहमदनगर / नगर सहयाद्री : वाळूची बेकादेशीर वाहतूक करणारी पिकअप खोल विहिरीत कोसळून मोठी दुर्घटना झाली. ही घटना धांदरफळ शिवारात घडली आहे. दरम्यान या पिकअप मधील चालक व तीन मजूर देखील पाण्यात बुडाले. त्यातील तीन मजूर विहिरीतून बाहेर येण्यास यश आले, परंतु चालकाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला.

अधिक माहिती अशी : संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उपसा सुरू आहे. धांदरफळ परिसरातील प्रवरा नदी पात्रातून वाळू उपसा करून वाळूने भरलेली पिकअप ही धांदरफळच्या दिशेने खाली होऊन येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी या पिकअपचा पाठलाग सुरु केला. पोलीस आपला पाठलाग करत असल्याचे पिकअप चालक गोरख नाथा खेमनर (वय 23, राहणार डिग्रस, ता. संगमनेर) याच्या लक्षात आले. पोलिसांचा पाठलाग चुकवण्यासाठी त्याने भरधाव वेगाने वाहन चालवले. पुढे गेल्यानंतर त्याने आपले वाहन एका शेतात घातले. मध्यरात्री पिकअप चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने त्याचा आपल्या वाहनावरील ताबा सुटला. वाळूची रिकामी पिकअप थेट रस्त्यालगत असणार्‍या शेतातील एका खोल विहिरीत कोसळली. या वाहनांमध्ये चालकासह तीन मजूर बसलेले होते.

वाळूची रिकामी पिकअप विहिरीत कोसळली. तिन मजुरांनी दोरीच्या साह्याने विहिरीच्या बाहेर येत आपला जीव वाचवला. मात्र पिकअप चालक गोरख खेमनर हा पिकअपसह विहिरीमध्ये बुडाला. विहिरीच्या पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. तालुक्यात वाळूची वाहतूक करणारे अनेक वाहने बेकायदेशीर आहे. काही वाहनांना कागदपत्रेही नाही. असे असतानाही वाळू वाहतूक करणारे चालक बेदरकारपणे वाळूची वाहतूक करत आहे. यामुळे अनेकदा अपघातही झाले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरच्या एसटी विभागाला मिळणार गिफ्ट? विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ यांचा विश्वास…

पारनेर। नगर सहयाद्री:- एसटी महामंडळाच्या नगर विभागासाठी २०० ई-बसची मागणी करण्यात आली आहे. दिवाळीपर्यंत या...

मातोश्रीचा आदेश आल्यास विधानसभा लढणार: पारनेरमध्ये कोणी थोपटले दंड, नेमकं काय म्हणाले पहा…

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम पारनेर |नगर सहयाद्री:- शिवसेना पक्ष तळागाळात पोहोचवण्यासाठी आम्ही...

शेतकरी संकटात! लष्करी अळी जोमात, मका पीक कोमात..

अप्पा चव्हाण। श्रीगोंदा:- दीड महिन्यापासून पेरणी केलेल्या खरिपातील पिकांना गत पंधरवड्यात झालेल्या पावसाने...

पुणे, कोल्हापूरच्या पार्श्वभूमीवर नगरमध्ये आ. जगताप अलर्ट; आयुक्तांना पत्र देत तातडीने केली ‘ही’ मागणी

अहमदनगर / नगर सह्याद्री - गेल्या काही दिवसांपासून पुणे, मुंंबई, कोल्हापूर येथे पावसामुळे पूर...