spot_img
अहमदनगरAhmednagar : निवडणुकीत बायकोचा पराभव झाला, त्यानंतर माजी सरपंचाने जे केलं ते...

Ahmednagar : निवडणुकीत बायकोचा पराभव झाला, त्यानंतर माजी सरपंचाने जे केलं ते त्याने गाव हादरलं

spot_img

अहमदनगर / नगर सहयाद्री : अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक नुकत्याच पार पडल्या. त्याचा लगेच निकालही लागला. परंतु अनेक लोक येथे झालेला पराभव जिव्हारी लागून घेतात. त्यातून वेवेगळे कृत्य करतात. अशीच एक घटना अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे घडला.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंच पदाच्या उमेदवार असलेल्या आपल्या बायकोचा दारुण पराभव झाल्याने निराश झालेल्या एका माजी सरपंचाने रात्री दारू पिऊन विरोधी गटातील प्रमुख कार्यकर्त्यांना फोन करून शिवीगाळ केली. त्याच झालं असं की, माजी सरपंचाच्या पत्नीने निवडणुकीत पालकमंत्र्यांच्या गटाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली.

त्यात त्यांचा पराभव झाला. हा पराभव त्यांच्या पतीच्या जिव्हारी लागला. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी त्यांनी रात्री दारू पिऊन विरोधी गटातील प्रमुख कार्यकर्त्यांना शिवीगाळ केली. सदर शिवीगाळ काही कार्यकर्त्यांच्या घरातील लोकांनी ऐकल्यानंतर त्यांनी त्याला जाब विचारला. दुसर्‍या दिवशी या सर्व कार्यकर्त्यांनी संबंधित पॅनलच्या प्रमुखांची भेट घेऊन त्यांच्या कानावर हा प्रकार घातला आणि त्यांना निर्वाणीचा इशारा दिला.

पॅनल प्रमुखांनी सुद्धा संबंधित माजी सरपंचाला बोलावून घेऊन त्याची चांगलीच कानउघाडणी केली. त्यामुळे सध्या तरी वातारण शांत झाले आहे. निवडणूक होतच असतात. हार जीत सुरु असते. त्यामुळे हा पराभव खिलाडू वृत्तीने घेतला पाहिजे. परंतु येथे मात्र वेगळेच पाहायला मिळालं. रागाच्याभरात या माजी सरपंचाने विरोधी गटाच्या निवडून आलेल्या सरपंचाच्या कार्यकर्त्यांना अशी घाणेरडी शिवीगाळ करून स्वतःचे हसू करून घेतले आहे. त्यामुळे तालुक्यामध्ये याच एकच चर्चा सुरु होती.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

एकनाथराव, ‘कांदा’ कृषीचा की उद्योग मंत्रालयाचा?

पूतना मावशीचे प्रेम थांबवा| सल्लागार बदला अन् ढोकणेंऐवजी दिलीप वळसे पाटलांकडून मंचरच्या कांदा केंद्राची...

नगरच्या एसटी विभागाला मिळणार गिफ्ट? विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ यांचा विश्वास…

पारनेर। नगर सहयाद्री:- एसटी महामंडळाच्या नगर विभागासाठी २०० ई-बसची मागणी करण्यात आली आहे. दिवाळीपर्यंत या...

मातोश्रीचा आदेश आल्यास विधानसभा लढणार: पारनेरमध्ये कोणी थोपटले दंड, नेमकं काय म्हणाले पहा…

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम पारनेर |नगर सहयाद्री:- शिवसेना पक्ष तळागाळात पोहोचवण्यासाठी आम्ही...

शेतकरी संकटात! लष्करी अळी जोमात, मका पीक कोमात..

अप्पा चव्हाण। श्रीगोंदा:- दीड महिन्यापासून पेरणी केलेल्या खरिपातील पिकांना गत पंधरवड्यात झालेल्या पावसाने...