spot_img
अहमदनगर'50 खोके शिंदे को ठोके' ..! संजय राऊतांचा अहमदनगरमधील संवाद मेळाव्यातून घणाघात

’50 खोके शिंदे को ठोके’ ..! संजय राऊतांचा अहमदनगरमधील संवाद मेळाव्यातून घणाघात

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : अहमदनगर जिल्ह्यातील सोनई येथे ठाकरे गटाचा संवाद मेळावा आज सुरु आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरेंवर २० जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठा घणाघात केला.

ते म्हणाले, आदर्श घोटाळा केलेल्या अशोक चव्हाणांना भाजपने घेतले. 70 हजार कोटींचा घोटाळा केलेले अजित पवार आज भाजप सोबत आहेत. आता घोषणा बदला, 50 खोके ‘शिंदे को ठोके’ असे म्हणा. भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालणारे सरकार उलटवून टाकायचे आहे आणि रामराज्य आणायचे आहे, असा घणाघात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

जे शिवसेनेच्या तिकिटावर वर्षोनुवर्षे निवडून आलेत. ते सोडून गेले, गद्दारी केली, हा शंकर आमच्यासोबत लक्ष्मणासारखा उभा आहे. काल अशोक चव्हाण सोडून गेले, का गेले, आमचे सरकार आल्यावर ही ईडी राहील. अशोक चव्हाण चांगला माणूस पण तो गेला, त्याचे वडील ही मुख्यमंत्री होते. तरीही गेले पक्षाने सर्व दिले तरी गेले. आदर्श घोटाळा सर्वात मोठा घोटाळा, असा आरोप भाजपने केला. तरीही त्यांना पक्षात घेतले.

कारगिलमधील शहीद कुटुंबियांना घर देणार. तिथे मोठी इमारत बांधली, पण एकही शहिद कुटुंबियांना घर नाही, हा आदर्श घोटाळा आहे. 70 हजार कोटींचा घोटाळा केलेले अजित पवार आज भाजप सोबत आहेत. आता घोषणा बदला, ’50 खोके शिंदे को ठोके’ असे म्हणताच एकच हशा पिकला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

एकनाथराव, ‘कांदा’ कृषीचा की उद्योग मंत्रालयाचा?

पूतना मावशीचे प्रेम थांबवा| सल्लागार बदला अन् ढोकणेंऐवजी दिलीप वळसे पाटलांकडून मंचरच्या कांदा केंद्राची...

नगरच्या एसटी विभागाला मिळणार गिफ्ट? विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ यांचा विश्वास…

पारनेर। नगर सहयाद्री:- एसटी महामंडळाच्या नगर विभागासाठी २०० ई-बसची मागणी करण्यात आली आहे. दिवाळीपर्यंत या...

मातोश्रीचा आदेश आल्यास विधानसभा लढणार: पारनेरमध्ये कोणी थोपटले दंड, नेमकं काय म्हणाले पहा…

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम पारनेर |नगर सहयाद्री:- शिवसेना पक्ष तळागाळात पोहोचवण्यासाठी आम्ही...

शेतकरी संकटात! लष्करी अळी जोमात, मका पीक कोमात..

अप्पा चव्हाण। श्रीगोंदा:- दीड महिन्यापासून पेरणी केलेल्या खरिपातील पिकांना गत पंधरवड्यात झालेल्या पावसाने...