शुक्रवारी पांडुरंग डामसे आणि त्यांची पत्नी लीलाबाई हे घास कापण्यासाठी शेतामध्ये गेल्यावर नदीपात्रात एक माणूस पाण्यावर तरंगताना आढळून आला.
संगमनेर । नगर सह्याद्री
वाट्याने शेती करणाऱ्या ४१ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह प्रवरा नदीच्या पात्रात आढळून आला आहे. घडलेला प्रकार संगमनेर खुर्द परिसरात शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडला आहे. मृत व्यक्तीने महिलेला पळवून आणून तिझ्यासोबत विवाह केला होता. त्या महिलेसह तिच्या अज्ञात साथीदारांविरोधात संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मारुती आबा डामसे (वय ४१, रा, संगमनेर खुर्द, ता. संगमनेर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे, दीपाली डामसे यांच्याविरोधात पांडुरंग आबा डामसे यांनी फिर्याद दाखल केली आहे. संगमनेर खुर्द येथे त्यांचे भाऊ मारुती डामसे, वहिनी दीपाली डामसे व पत्नी लीलाबाई यांच्यासमवेत पांडुरंग डामसे हे वाट्याने शेती करून राहत होते. त्यांचे बंधू मारुती डामसे यांचे पहिले लग्न होऊन घटस्फोट झाला होता, त्यानंतर तीन वर्षांपूर्वी एका विवाहित महिलेला पळून आणले होते, नोटरी करून त्यांनी मंदिरात विवाह केला होता.
संगमनेर खुर्द येथे पती-पत्नी म्हणून एकत्र राहत होते. त्यांच्यात भांडणे होत असल्याने दीपाली तिच्या माहेरी निमगिरी, ता. जुन्नर, जि. पुणे येथे निघून गेली. बुधवारी ८ वाजेच्या सुमारास मारुती डामसे यांच्या मोबाइलवर फोन आल्यावर दीपाली डामसे हिचा आवाज आला. मी म्हसोबा मंदिराजवळ आले आहे, तुम्ही तेथे या त्यानंतर मारुती डामसे तेथे गेले. ते एकटेच गेल्याने बराच वेळ होऊन मारुती डामसे घरी न परतल्याने शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांचा फोनही बंद लागत होता.
शुक्रवारी पांडुरंग डामसे आणि त्यांची पत्नी लीलाबाई हे घास कापण्यासाठी शेतामध्ये गेल्यावर नदीपात्रात एक माणूस पाण्यावर तरंगताना आढळून आला. खडकावर रक्ताचे डाग असल्याने याबाबतची माहिती पोलिसांना कळविली. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला असता तो मारुती डामसे यांचा असल्याचे समोर आले. पोलिसांत गुन्हा दाखल केला असून अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान मथुरे करीत आहेत.
COMMENTS