बीड जिल्ह्यातील गेवराई येथे गाडीमध्ये घेऊन गेले. लाथा-बुक्क्याने मारहाण करत विनोद यांच्या पत्नी त्यांच्या नावावर जमीन करण्यास सांगितले.
पुणे । नगर सह्याद्री
काही दिवसांपूर्वी धोंड्याचा महिना असल्याने जावयाला वाण देण्याची प्रथा असते. त्यानंतर जावई, मुली आणि नातवांना बोलवून जावयाला वाण दिले जाते. जावयाच्या थाट असणाऱ्या या महिन्यानंतर श्रावण सुरु झाला आणि सासऱ्याने जावयाचे अपहरण केल्याचा आरोप जावयाने केला आहे. या घटनेने पोलीस देखील हैराण झाले.
काय आहे प्रकरण ?
विनोद साहेबराव आडे यांच्या पत्नीने काही दिवसापूर्वी त्यांच्या पतीकडे मंगळसूत्र मागितले होते. त्यानंतर पतीने समजूत पत्नीची समजूत काडून देखील हट्ट सोडला नाही. त्यानंतर पत्नी विनोद आडे यांनाच शिवीगाळ करु लागली. त्यानंतर त्याच विषयावर पुन्हा वादविवाद झाल्याने तिने आपल्या माहेरी फोन करत पती मारहाण करत असल्याचे सांगितले.
त्यानंतर विनोद यांचे सासरे प्रकाश गेमा राठोड, चुलत सासरे रमेश राठोड, दादासाहेब राठोड आणि मामा सासरे योगेश वडते, मंगेश वडते हे त्यानंतर बीडवरुन आले. ते बीड जिल्ह्यातील गेवराई येथे गाडीमध्ये घेऊन गेले. लाथा-बुक्क्याने मारहाण करत विनोद यांच्या पत्नी त्यांच्या नावावर जमीन करण्यास सांगितले. तीन दिवस गोठ्यात बांधून ठेवल्यानंतर त्याला सोडून दिले.
बीड जिल्ह्यातून विनोद आडे पुण्यामध्ये आल्यावर येवरडा पोलिसात तात्काळ धाव घेऊन सासऱ्याविरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणाचा अधिक तपास येरवडा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक होले करत आहेत.
COMMENTS