जालना / नगर सहयाद्री मराठा आरक्षणासाठी मनोज जरंगे यांचे १७ दिवस उपोषण सुरु होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातून त्यांनी उपोषण सोडलं...
जालना / नगर सहयाद्री
मराठा आरक्षणासाठी मनोज जरंगे यांचे १७ दिवस उपोषण सुरु होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातून त्यांनी उपोषण सोडलं.
मराठ्यांना सरसकट कुणबी जातप्रमाणपत्रच्या मागणीसाठी जरांगे पाटील आग्रही आहेत. परंतु भाजपा नेते नारायण राणे यांनी आक्षेप घेतला की मराठ्यांना सरसकट आरक्षण न देता आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या.
आता यावर मनोज जरांगे पाटलांनी प्रत्युत्तर दिलंय. नारायण राणे यांचं नेमकं म्हणणं काय? - मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले नकोत. हा निर्णय घेताना राज्य सरकारने घटनेतील कलम १५ चा अभ्यास करावा. सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेले मराठा समाजाचे जे लोक आहेत त्यांना आरक्षण द्यावं. सरसकट कुणबी दाखला ही ९६ कुळी मराठ्यांची मागणी नाही असं नारायण राणेंनी म्हटलं आहे.
मनोज जरांगे पाटील यावर काय म्हणले - सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, ही आमची मागणी आहे. कुणबी जात प्रमाणपत्र घ्यायचं की नाही हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. या आरक्षणामुळे गोरगरीब मराठा समाजातील पोराचं कल्याण होणार आहे.
ज्यांना शिक्षण आणि नोकरीसाठी आरक्षण लागतं तर ते कुणबी प्रमाणपत्र काढू शकतात. हे प्रमाणपत्र घेतलंच पाहिजे, ही जबरदस्ती नाही. ज्यांना आवश्यक आहे, अस्तित्व टिकवण्यासाठी मराठ्यांची गोरगरीब पोरं जातप्रमाणपत्र घेऊ शकतात. ही यामागची मूळ भूमिका आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
COMMENTS