शिवसेनेच्या ठाकरे गटाची जिल्हाधिकार्यांकडे मागणी / जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करुन शासनाने शेतकर्यांना मदत द्यावी - प्रा. शशिकांत गाडे अहमदनग...
शिवसेनेच्या ठाकरे गटाची जिल्हाधिकार्यांकडे मागणी / जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करुन शासनाने शेतकर्यांना मदत द्यावी - प्रा. शशिकांत गाडे
अहमदनगर / नगर सह्याद्री -
अहमदनगर जिल्ह्यामध्ये बहुतांश तालुक्यामध्ये पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात यावा, या बाबतचे निवेदन शिवसेना (ठाकरे गट) च्यावतीने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना देण्यात आले.
याप्रसंगी दक्षिण जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, उपजिल्हाप्रमुख गिरिष जाधव, शहरप्रमुख संभाजी कदम, तालुकाप्रमुख राजेंद्र भगत, अनिल बोरुडे, आशाताई निंबाळकर, प्रकाश कुलट, प्रविण गोरे, सनी लांडगे, प्रविण कोकाटे, पोपट निमसे, जिवा लगड, संदिप गुंड, बाबा ससे, रामेश्वर सोलाट, प्रशांत कांबळे, रवि वाकळे, संतोष गेनप्पा, शाम नळकांडे, प्रशांत गायकवाड, दत्ता कावरे, घनश्याम घोलप, संतोष तनपुरे, सुशिल कदम, मुन्ना भिंगारदिवे, महेश शेळके, गिरिष हांडे, अशोक दहिफळे, अनिल परभाणे, सुधाकर हारदे, अरुण ससे, माणिक गोरे, विजय लांडगे आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अहमदनगर जिल्ह्यामध्ये बहुतांशी तालुक्यांमध्ये यंदाच्या वर्षी अत्यल्प पाऊस पडला आहे. त्यामुळे शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. अनेक तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या चार्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच विहिरी व बोरच्या पाण्याची पातळी खालवत चालली आहे. त्यामुळे यावर्षी जनावरांसाठी चारा व छावण्या तसेच पिण्याच्या पाण्यासाठी शासनाच्या वतीने त्या-त्या तालुक्यांमध्ये पाण्याचे टँकर सुरु करण्याबाबतचे नियोजन करावे. शेतकर्यांना रब्बी व खरीपाचे पीक पाण्याअभावी जळून चालले आहेत तर फळबागा पाण्याअभावी उध्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे शेतकरी अतिशय मेटाकुटीला आला आहे. अशा परिस्थितीत शासनाने नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर करुन त्यावर उपाययोजना करणेबाबत योग्य ते नियोजन करावे, असेही निवेदनात म्हटले आहे.
याप्रसंगी प्रा.शशिकांत गाडे म्हणाले, यंदाच्या पावसाळा हा पुर्णपणे कोरडा गेला आहे. जिल्ह्यात जुन महिन्यात पासून झाला नाही, जुलै महिन्यात थोडाफार झाला, त्यानंतर ऑगस्ट व आता सप्टेंबर महिन्यातही पाऊस न झाल्याने केलेली पेरणी वाया गेली आहे. त्यामुळे दुबार पेरणीची संकट निर्माण झाले असून, त्यातच पावसाचीही शक्यता दिसत नसल्याने शेतकर्यांना मोठा फटका बसला आहे. शासनाने यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने दुष्काळ जाहीर करुन शेतकर्यांना पीक विमा, वीज बिल माफी, अनुदान अशा स्वरुपाची मदत करण्यात यावी, असे प्रा.गाडे यांनी म्हटले आहे.
COMMENTS