गणेश विसर्जन मिरवणूक याच मार्गावरून काढली जात असल्यामुळे नागरिक पथदिवे बसवण्यासाठी मागणी करत आहेत.
अहमदनगर । नगर सहयाद्री
शहरामधील टीव्ही सेंटर ते गुलमोह रोड चौकापर्यंत बसविण्यात आलेल्या खांबांवर अद्याप दिवे लावले जात नाही. त्यामुळे रस्तावर गेल्या कित्येक दिवसांपासून अंधार आहे. महानगर पालिका घटनेची नोंद घेत नसल्याने माजी नगरसेवक तायगा शिंदे यांनी शनिवारी रात्री या खांबांवर मशाल लावून आंदोलन केले आहे.
गणेशोत्सवापूर्वी महापालिकेने पथदिवे बसवावे अन्यथा तीव्र आंदोलन करून अज्ञातस्थळी आत्मदहन करण्याचा इशारा माजी नगरसेवक शिंदे यांनी दिला आहे. प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून प्रोफेसर कॉलनी चौक रस्त्यावर पथदिव्यांसाठी खांब बसवले आहेत परंतु त्यावर पथदिवे न बसविल्याने रस्त्यावर अंधार होतो. त्यामुळे रस्त्यावर सतत अपघाताची मालिका सुरु असते.
गणेश विसर्जन मिरवणूक याच मार्गावरून काढली जात असल्यामुळे नागरिक पथदिवे बसवण्यासाठी मागणी करत आहेत. या आंदोलनावेळी नगरसेविका शिंदे, सतीश शिंदे, संतोष लोखंडे, प्रशांत वाघ, मनीष शिंदे, प्रमोद कुलकर्णी, ओंकार आरडे, कुणाल पडजाते, डॉ. म्हस्के, निलेश चिप्पा, सागर शिंदे, गणेश शिंदे, शुभम शिंदे, आदित्य शिंदे उपस्थित होते.
COMMENTS