SBI ग्राहकांना सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये नावनोंदणी करण्यासाठी पासबुकची गरज भासणार नाही, परंतु नोंदणीसाठी आधार कार्ड आवश्यक असल्याचे सांगितले आहे.
मुंबई । नगर सह्याद्री
स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी भन्नाट योजना सुरु केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी या बँकेच्या ग्राहकांना आधार कार्ड क्रमांक वापरून योजनेचा फायदा घेता येणार आहे. 25 ऑगस्ट रोजी बँकेने प्रेस नोटमध्ये याबाबतची माहिती दिली आहे.
SBI ग्राहकांना सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये नावनोंदणी करण्यासाठी पासबुकची गरज भासणार नाही, परंतु नोंदणीसाठी आधार कार्ड आवश्यक असल्याचे सांगितले आहे. आता SBI च्या ग्राहक सेवा केंद्रांना भेट देणाऱ्या ग्राहकांना सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये नावनोंदणीसाठी आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे हे काम पूर्वीपेक्षा जास्त सोईचे होणार आहे.
सामाजिक सुरक्षा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना या संदर्भात एसबीआयचे अध्यक्ष दिनेश खारा म्हणाले की, आर्थिक सुरक्षिततेच्या योजनांमधील कोणत्याही प्रकारचा अडथळा दूर करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. यानंतर, सामाजिक सुरक्षा योजनांची व्याप्ती लक्षणीयरीत्या वाढण्याची अपेक्षा आहे.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना असून ही एक वर्षाची जीवन विमा योजना असून ही योजना कोणत्याही कारणामुळे मृत्यूपासून संरक्षण देते. तसेच 2 लाख रुपयांचे आयुर्विमा संरक्षण केवळ 436 रुपये प्रतिवर्ष प्रीमियमवर उपलब्ध होणार आहे.
COMMENTS