शेतीच्या वादातून मुलांनीच जन्मदात्या वडिलांवर हल्ला केला. ही खळबळजनक घटना अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात घडली.
मुंबई / नगर सह्याद्री -
शेतीच्या वादातून मुलांनीच जन्मदात्या वडिलांवर हल्ला केला. ही खळबळजनक घटना अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात घडली. या हल्ल्यात वडील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अकोल्यातील बाळापूर तालुक्यातील शेतकरी जितेंद्र ताथोड यांच्यावर मुलांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. हा सर्व प्रकार घरगुती वादातून घडला. जितेंद्र ताथोड यांच्याकडे राम ताथोड व बजरंग ताथोड यांनी घरचा हिस्सा मागितला. मात्र जितेंद्र ताथोड यांनी त्यास नकार दिला.
या कारणावरून दोन्ही भावांनी कट रचून वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत वडिलांवर कोयत्याने वार केले. मुलांच्या या हल्ल्यात वडील गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सध्या जितेंद्र ताथोड यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी मारहाण करणाऱ्या दोन्ही मुलांविरुद्ध उरळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खळबळजनक घटनेने संपूर्ण बाळापूर तालुका हादरला आहे.
COMMENTS