अहमदनगर / नगर सह्याद्री श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे युवकांना झालेल्या मारहाणीचे प्रकरण जिल्हाभर गाजले. महाराष्ट्रातील काही बड्या ने...
अहमदनगर / नगर सह्याद्री
श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे युवकांना झालेल्या मारहाणीचे प्रकरण जिल्हाभर गाजले. महाराष्ट्रातील काही बड्या नेत्यांनी देखील यात लक्ष घातले. दरम्यान आता या प्रकरणात एलसीबीने दोघांना अटक केली आहे.
युवराज नानासाहेब गलांडे (वय ३६) व मनोज वसंत बोडखे असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तालुक्यातील हरेगाव येथील कुणाल मगर, शुभम माघाडे, ओम गायकवाड, प्रणय खंडागळे यांना हातपाय बांधून झाडाला उलटे टांगून निर्दयपणे मारहाण करण्यात आली होती.
या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला. या घटनेनंतर वातावरण तणावपूर्ण बनले. दरम्यान पोलिसांनी कार्यवाही करत या प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेतले आहे.
दरम्यान यातील आरोपींना दोन दिवसात अटक करुन त्यांच्यावरील खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली होती.
COMMENTS