अहमदनगर | नगर सह्याद्री जगाच्या नकाशावर भारत देशाचे नाव इस्रोच्या शास्त्रज्ञांनी कोरले आहे. चंद्रयान ३ यशस्वीपणे उतरले असून भारत देशामध्ये ...
अहमदनगर | नगर सह्याद्री
जगाच्या नकाशावर भारत देशाचे नाव इस्रोच्या शास्त्रज्ञांनी कोरले आहे. चंद्रयान ३ यशस्वीपणे उतरले असून भारत देशामध्ये मोठा आनंद उत्सव साजरा केला जात आहे. भारत देशाने जगाच्या पाठीवर आजच्या युवा पिढीसमोर इतिहास रचला आहे. चंद्रयान ३च्या माध्यमातून चंद्रावरील सर्व सखोल माहिती जगासमोर येणार आहे.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील खूप कमी माहिती जगाकडे आहे. चांद्रयान ३ या मिशनमुळे भारताला चंद्राच्या दक्षिण धुव्रारील मोठी माहिती मिळेल.त्यामुळे भारत देशाचे जागतिक पातळीवर मोठे बलस्थान निर्माण झाले आहे.असे प्रतिपादन राष्ट्रवादी विधार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे यांनी केले.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने चंद्रयान ३ ची यशस्वी चाचणी झाल्याबद्दल आनंद उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक माणिकराव विधाते, नगरसेवक प्रकाश भागानगरे, प्राध्यापक अरविंद शिंदे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे, योगेश नेमाने, साधना बोरुडे,अमित खामकर, माऊली जाधव,भरत गारुडकर, उमेश धोंडे, विशाल बेलपवार, स्वप्नील भोरे, निलेश इंगळे, अब्दुल खोकर, शानवाज शेख, शाहरुख शेख, ऋषिकेश बागल, प्रांजल खाकाळ, समीर भिंगारदिवे, जितेंद्र बनकर आदी उपस्थित होते.
COMMENTS