शेतक-यांना आवाहन करत ३५०० हजार हमीभाव दिला नाही तर पहिले मुबई नंतर दिल्ली दरबारी कांद्याचा लढा धडकणार असल्याने खासदार कोल्हेंनी जाहिर केले आहे.
मुंबई / नगर सह्याद्री -
केंद्र सरकार महाराष्ट्रातून २४१० रुपये दराने २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार असून नाशिक आणि अहमदनगरमध्ये विशेष खरेदी केंद्रे सुरू करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. मात्र हा निर्णय शेतकऱ्यांची दिशाभूल करणारा आहे, असा आरोप शेतकरी आणि स्वाभिमानी किसान संघाने केला आहे. कांद्याला ४०० ते ५०० रुपये भाव मिळत असताना सरकार झोपले आहे का, असा सवालही शेतकऱ्यांनी केला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी आणि श्रीरामपूर बाजार समित्यांमध्ये आज कांदा लिलाव बंद ठेवून व्यापाऱ्यांनीही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात आंदोलने सुरू असून केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात शेतकरी आक्रमक होताना दिसत आहेत.
शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम करु नका कांद्याला हमीभाव द्या. त्याशिवाय तुम्हाला सुट्टी नाही असे म्हणत अमोल कोल्हेंचा आंदोलन स्थळावरुन थेट केंद्र आणि राज्य सरकारला इशारा दिलाय. आता भाव लढवून मिळवावा लागणार असे शेतक-यांना आवाहन करत ३५०० हजार हमीभाव दिला नाही तर पहिले मुबई नंतर दिल्ली दरबारी कांद्याचा लढा धडकणार असल्याने खासदार कोल्हेंनी जाहिर केले आहे.
कांद्याच्या प्रश्नावर लासलगाव समिती मार्केटचे अध्यक्ष बाळासाहेब सिरसागर म्हणाले की, केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्क वाढवण्यासंदर्भात आज नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. अवघ्या दहा मिनिटांत ही बैठक संपली, मात्र या बैठकीतही कोणताही तोडगा निघाला नाही. भारतातील विविध ठिकाणी सीमेवर अडकलेला सुमारे २१ हजार टन कांदा सरकारने ड्युटीशिवाय सोडावा, त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे. निर्णय होईपर्यंत लिलाव बंद ठेवण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
COMMENTS