मी राष्ट्रवादी, पवार परिवाराबरोबर / पारनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची बुथ आढावा बैठक पारनेर / नगर सह्याद्री - राजकारणात कधी काय होईल सां...
मी राष्ट्रवादी, पवार परिवाराबरोबर / पारनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची बुथ आढावा बैठक
पारनेर / नगर सह्याद्री -
राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही. सध्याच्या घडामोडी पाहता आपण राजकारण सोडून द्यावे की काय अशी अवस्था झाली आहे. राजकारण अभिमन्यू सारखे झाले असून हा परिवार एक राहिला पाहिजे. हा परिवार महाराष्ट्राचे हित जपणारा व विकासाला दिशा देणारा आहे. त्यामुळे मला काही मिळाले नाही तरी चालेल; परंतु महाराष्ट्र, देशाच्या हितासाठी पवार कुटुंबिय राजकारणात राहिले पाहिजे, असे आमदार नीलेश लंके म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस व नीलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने पारनेर येथील आनंद लॉन येथे राजकीय घडामोडी व आगामी निवडणुकांवर चर्चा करण्यासाठी मंगळवारी बुथकमिटी आढावा बैठक आयोजित केली होती. त्यावेळी आ. लंके बोलत होते. दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय घडामोडी दुर्भाग्यपूर्ण आणि धक्का देणार्या असल्याचे सांगत आ. लंके म्हणाले, राजकारणात आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आहोत. राष्ट्रवादी हा परिवार आहे, हा परिवार सक्षम असून खासदार शरद पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, अजित पवार यांच्या बरोबर असून राजकारणात कुठलाही निर्णय घेतला तरी मान्य होतो की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे. सोशल मीडियावर अनेक मतांतर येत आहेत. आपण पवार कुटुंबिया बरोबर आहोत, त्यामुळे कुटुंबात काही निर्णय घेता येत नाही. हा परिवार आहे. मतदार संघाचा फायदा असे पायाजवळ न पाहता पुढील १० वर्षे त्याचा फायदा झाला पाहिजे. अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केली आहे. राजभवनात शपथविधीला गेलो असता जे काही चालले आहे ते धक्कादायक होते. नेता कुठलाही निर्णय घेत असताना काही उद्देश व संदर्भ असतो. त्यामुळे गेल्या तीन ते चार वर्षांत घट्ट नाते या कुटुंबियांशी झाले आहे. या तिघांचे प्रेम व नाते माझ्या बरोबर आहे.
आमदार लंके म्हणाले, काही दिवसांत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लागु शकतात. त्यामुळे रात्रीतून काही होवू शकते, हे राजकीय घडामोडीतून दिसून येत आहे. बुथ कमिटी ही सर्वच निवडणुकीसाठी महत्त्वाची आहे. आपल्या तालुयाचा व मतदारसंघाचा पाया भक्कम केला पाहिजे. याचा फायदा प्रत्येक निवडणुकीत होईल. मतदारसंघात ३६५ बुथ असून प्रत्येकाचा अभ्यास केला आहे. त्यामुळे कुठल्याही क्षणी कोणत्याही प्रकारची निवडणूक लागली तरी सामोरे जाता आले पाहिजे. ५० टक्के महिलांना आरक्षण असून काम पण सक्षम केले पाहिजे. बुथकमिटी हा स्थानिक पातळीवरील विषय असून गावनिहाय, गणनिहाय व गटनिहाय काम केले पाहिजे. सर्व घटकांवर जबाबदारी सोपवून मायक्रो नियोजन केल्यास त्याचा फायदा सर्वच निवडणुकांत ह़ोऊ शकतो.
यावेळी सभापती तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष बाबाजी तरटे, नगराध्यक्ष नितीन अडसुळ, जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, अशोक सावंत, प्रशांत गायकवाड, उपसभापती बापूसाहेब शिर्के, सुदाम पवार, बाळासाहेब खिलारी, गंगाराम बेलकर, डॉ खोडदे, संदीप सालके, विजय पवार, श्रीरंग रोकडे, राहुल झावरे, दादा शिंदे, कारभारी पोटघन, मेजर वसंत कवाद, ठकाराम लंके, दीपक पवार, सचिन पठारे, शेळके, पारनेर नगरपंचायतचे सर्व आजी माजी सभापती व नगरसेवक खंडू भुकन, शिवाजी आप्पा मोरे, भाऊसाहेब भोगाडे, सोमनाथ आहेर, रा. या. औटी, बाळासाहेब खिलारी, संजय लाकुडझोडे, सुवर्णा धाडगे, वंदना गंधाक्ते, पुनम मुंगसे, दिपाली औटी, वैजयंता मते, मनिषा जाधव, संगीता दरेकर, पाकीजा शेख, कल्पना थोरात, विजय डोळ, नंदु देशमुख, बंडू गायकवाड, बबलुशेठ रोहकले, सुनिल करंजुले, शिवा शिंदे, राजू शिंदे, चंद्रभान ठूबे, रविंद्र राजदेव, पोपट गुंड, राजू चेडे, आप्पा शिंदे, बाजीराव दुधाडे, राजू चेडे, सतिष भालेकर, दौलत गांगड, रविंद्र गायके, किसन गंधाडे, बाळासाहेब पुंड, अनिल गंधाक्ते, ज्ञानदेव लंके गुरुजी, जितेश सरडे, पाणी पुरवठा सभापती योगेश मते, मा.सरपंच बाळासाहेब नगरे, बांधकाम सभापती भूषण शेलार, श्रीकांत चौरे, संदीप चौधरी, महेंद्र शिंदे, शशी आंधळे, गुंडा भोसले, संदीप ठाणगे, किरण ठूबे, आनंदा औटी. कांतीलाल भोसले, प्रविन थोरात, बी. ए. भगत, महेंद्र गायकवाड, बाळासाहेब दिघे, सुभाष गाजरे, किरण म्हस्के यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लालदिवा मिळाल्यास विचार करावा
राष्ट्रवादी काँग्रेस व नीलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक पदाधिकार्यांनी राजकीय घडामोडीत मंत्रीपदाची संधी मिळाली तर विचार करावा, अशी मागणी आपल्या भाषणात केली. त्यामुळे आमदार नीलेश लंके जी भूमिका घेतील त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला आहे.
तुमच्या मनाप्रमाणे होईल..
अजित पवार यांची राजकीय कारकीर्द पुढे नेणे महत्वाचे आहे. माझ्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. दोन्ही पक्षांनी बैठक बोलावली आहे. शरद पवार यांनी ५४ वर्षे राजकारण केले असून त्यांच्याकडे काही तरी दुरदृष्टी आहे. अजित पवार यांनी अर्थमंत्री असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना झुकते माप दिले. त्यामुळे तुमच्या मनात जे आहे तेच होईल, असे सांगत आमदार नीलेश लंके यांनी आपल्या भूमिकेबाबत गौडबंगाल कायम ठेवले. लालदिवा शुल्लक असून पवार कुटुंबियाबरोबर राहिले पाहिजे, असेही ते म्हणाले.
COMMENTS