पारनेरच्या अधिकार्याच्या नियोजनाचे देशभरात कौतुक | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह रेल्वेमंत्री व मुख्यमंत्र्यांची कौतुकाची थाप शरद झावरे...
पारनेरच्या अधिकार्याच्या नियोजनाचे देशभरात कौतुक | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह रेल्वेमंत्री व मुख्यमंत्र्यांची कौतुकाची थाप
शरद झावरे | नगर सह्याद्री
ओडिसा राज्यातील बालासोरमध्ये झालेल्या रेल्वे दुर्घटनेत २७५ प्रवाशांचा मृत्यू झाला तर १२०० हून अधिक जखमी झाले होते. परंतु या जखमीवर पहिल्यांदा तातडीने उपचार करत जीवनदान देण्याचे काम पारनेर तालुयातील वडगाव सावताळ येथील भुमीपुत्र जिल्हाधिकारी दत्तात्रय भाऊसाहेब शिंदे यांनी केले आहे. या मराठमोळ्या जिल्हाधिकारी दत्तात्रय शिंदे यांच्या आपत्ती व्यवस्थापन नियोजनामुळे देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर दुसरीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व ओडिसा मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी कौतुकाची थाप मारत सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. रेल्वे दुर्घटना चांगल्या पद्धतीने हाताळल्याने व शेकडो जखमींना जीवनदान मिळाल्याने पारनेरचे नाव देशाच्या पटलावर चर्चेत आले आहे.
दत्तात्रय शिंदे पारनेर तालुयातील..
पारनेर तालुयातील वडगाव सावताळ येथील दत्तात्रय शिंदे यांनी २०१६ ला यूपीएससी परीक्षेत बाजी मारली. ते देशात ३७७ व्या रँक आले होते. अहमदनर जिल्ह्यातील पारनेर तालुयातील वडगाव सावतळ हे त्यांचं मूळ गाव. प्राथमिक शिक्षण टाकळी ढोकेश्वरला झालं. त्यानंतर नगरला १०वी पर्यंत शिक्षण झालं. पुण्यात ११वी आणि १२वी सायन्स केलं. मग फर्ग्युसनमधून बीए केलं. आणि २०११ मध्ये यूपीएसची अभ्यास सुरू केला आणि २०१६ ला यशस्वी झाले. या रेल्वे दुर्घटनेत त्यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवून पारनेर तालुयाचा झेंडा अटकेपार फडकवला आहे.
ओडिशाच्या बालासोरमध्ये झालेल्या भीषण रेल्वे दुर्घटनेला तीन ते चार दिवस झाले. अतिशय भीषण अशा या दुर्घटनेत २७५ प्रवाशांचा मृत्यू झाला तर १२०० हून अधिक जखमी झाले. अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान बालासोर प्रशासनासमोर आहे. ओडिशातील या दुर्घटनेत अनेकांसाठी देवदूत ठरले ते मराठमोळे अधिकारी दत्तात्रय शिंदे. दत्तात्रय शिंदे हे बालासोरचे जिल्हाधिकारी आहेत. जून २०२२ मध्ये त्यांनी जिल्हाधिकारीपदाची सूत्र घेतली. बालासोरमधील भीषण दुर्घटनेनंतर तेथील रेल्वेवाहतुक पूर्ववत झाली आहे. ही रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यासाठी रेल्वेचे १ हजार कामगार अविश्रांत काम करत ५१ तासांत ही रेल्वे वाहतूक पूर्ववत झाली.
यावेळी जिल्हाधिकारी दत्तात्रय शिंदे म्हणाले की, ज्यावेळेस अपघात झाल्याचं कळलं त्यानंतर पाउण तासात घटनास्थळी होतो. त्यावेळी मोठ्या प्रमाणावर रुग्णवाहिका, डॉटर आणि स्वयंसेवकांची मोठी गरज होती. याची सर्व माहिती मी सरकारला दिली आणि एका तासात १०० रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या. इतर ठिकाणचे डॉटर्स होते. त्यांना पाठवण्यात आलं. बरेचसे स्वयंसेवक तिथे होते. यावेळी मृतदेह बाहेर काढण्याऐवजी तुम्ही जखमींना तातडीने बाहेर काढा. म्हणजे जास्तीत जास्त लोकांना वाचवता येईल, अशा सूचना स्वयंसेवकांना दिल्या, अशी माहिती दत्तात्रय शिंदे यांनी दिली.
पंतप्रधान, रेल्वेमंत्री यांनी साधला जिल्हाधिकारी शिंदेशी संवाद..
पारनेर तालुयातील वडगाव सावताळचे रहिवासी असलेले जिल्हाधिकारी दत्तात्रय भाऊसाहेब शिंदे यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख नात्याने या दुर्घटनेची परिस्थिती चांगल्या प्रकारे सांभाळली. या दुर्घटने दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, ओडिसा मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी भेट दिली असता जिल्हाधिकारी दत्तात्रय शिंदे यांच्याशी संवाद साधला. या दुर्घटनेतील जे जखमींना व मृतांच्या कुटुंबीयांना सर्वोत्तरी मदत करण्याचे काम जिल्हाधिकारी शिंदे यांनी केले आहे. त्यामुळे पारनेरकरांच्या दृष्टीने निश्चितच ही अभिमानाची बाब असून वडगाव सावताळचे नाव देशाच्या पटलावर पुन्हा एकदा झळकले आहे.
हैदराबादमधून एक व्यक्ती आली होती. आणि त्यांची मुलगी आणि पत्नी ट्रेनने प्रवास करत होते. सर्व मृतदेहांचे आमच्याकडे फोटो आहेत. आणि त्याची यादी आम्ही केली आहे. यामुळे त्यांना त्यांची पत्नी मिळाली. पण मुलगी सापडत नव्हती. आम्ही राज्याच्या नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्या मुलीचा फोटो पाठवला. तिचा शोध लागला आणि तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्यांना एक धक्का बसला असला तरी त्यांची मुलगी वाचवण्याचा आम्ही प्रयत्न केला, असं दत्तात्रय शिंदे यांनी सांगितलं. या घटनेनंतर काही वेळापूर्वी आपल्याला स्फोट झाल्याची माहिती फोनवरून मिळाली होती. भीषण अपघातामुळे खूप मोठा आवाज झाला होता. घटनास्थळी पोहोचल्यावर भीषण अपघात झाल्याचं दिसलं. या घटनेतील ११०० हून अधिक जखमींपैकी ९०० जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. जवळपास २०० जणांवर अजूनही उपचार करण्यात येत आहे. अजूनही मृतांपैकी १०१ जणांची ओळख पटलेली नाही, अशी माहिती रेल्वे अधिकार्याकडून देण्यात आली आहे. दरम्यान या अपघातात ४० जणांचा मृत्यू हा विजेचा झटयाने झाल्याचं समोर आलं आहे.
COMMENTS