मुंबई। नगर सहयाद्री - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा काल मुंबई दौऱ्यावर होते. भाजपने आयोजित केलेल्या मेळाव्यात देवेंद्र फडणवीसांनी यां...
मुंबई। नगर सहयाद्री -
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा काल मुंबई दौऱ्यावर होते. भाजपने आयोजित केलेल्या मेळाव्यात देवेंद्र फडणवीसांनी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. राजाचा जीव पोपटात आहे, दुसरा पोपट कोणता आहे तर बीएमसी असे यावेळी म्हणत कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवणारच असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, कोरोना काळात भाजपाचा एकही कार्यकर्ता घरी बसला नाही. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत संघर्ष करत होतो. अडीच वर्षांनी आपल्या आशीर्वादाने शिवसेना आणि भाजप सरकार आलं आहे. शिवसेना नेते मोदींचे मोठे मोठे फोटो लावून निवडून आले होते. मोदींचे मोठे फोटो आणि उद्धव ठाकरेंचा स्टँप साईज फोटो लावत होते. राजाच्या मेलेल्या पोपटाची गोष्ट सांगत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, सातत्याने बेकायदेशीर सरकार असल्याचे सांगत होते. पण सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे यांचेच सरकार कायदेशीर असल्यावर शिक्कामोर्तब केलं. काही जण बोलतात, आम्हीच जिंकलो. आताचं सरकार टिकणारं आहे, काम करणारं आहे, पुन्हा निवडून येणारं आहे. वसुली किती केली यासाठी वाजेची कथा सांगण्याची गरज नाही. महाराष्ट्रावर सूड उगवण्याचे काम यांनी केले. भुयारी मेट्रो सुरु झाली असती, ती यांनी थांबवून ठेवली.राजाचा जीव पोपटात आहे, दुसरा पोपट कोणता आहे तर बीएमसी असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, हा राजकीय प्राण नाही, तर कुरण आहे. २५ वर्षे कुरण खाऊन हे मोठे झाले आहेत. ही महापालिका लुटून खाल्ली आहे. पुढची ४० वर्षे रस्त्यावर खर्च करावा लागणार नाही म्हणून रस्ते काँक्रिट करायला हे विरोध करत आहेत. असेच मुंबईला लुटत गेले, खात गेले आहेत. धारावी प्रकल्प अंतिम टप्प्यात आणला होता, अडीच वर्षे यांनी हात लावला नाही. आता आपण टेंडर काढलं आहे, तीन महिन्यात काम सुरु होईल.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबई महापालिकेच्या पैशांचा खुराक जोपर्यंत बंद होत नाही, मुंबई महापालिका तिजोरी मुंबईकरांच्या हाती देत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही. मुंबई महापालिका जिंकायची आहे ती कुणाला महापौर किंवा उपमहापौर बनवायला नाही तर मुंबई महापालिका आणि तिजोरी मुंबईकराच्या हातात द्यायची आहे. सर्व आघाडी आणि मोर्चांनी ताकद लावली तर मुंबई महापालिकेवर भाजप, शिवसेना व रिपाइचा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही.
COMMENTS