सुपा | नगर सह्याद्री नगर-पुणे महामार्गावर १३ वर्ष टोल वसुल करणारी कंपनी मुलभुत व बंधनकारक सुविधा उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरली आहे. त्यामुळ...
सुपा | नगर सह्याद्री
नगर-पुणे महामार्गावर १३ वर्ष टोल वसुल करणारी कंपनी मुलभुत व बंधनकारक सुविधा उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरली आहे. त्यामुळे अपुर्ण व निकृष्ठ दर्जाच्या कामामुळे नगर-पुणे महामार्गावर सतत अपघात, वाहतुक कोंडी होऊन शाळकरी मुलं जेष्ठ नागरिकांचे अपघात होऊन अनेक निरपराध नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. व लागत आहे. अनेक निरपराध नागरिकांना अपंगत्व प्राप्त झाले आहे. या सर्व गोष्टींचा विचार करुन संबंधित अधिकारी यांना वेळो वेळी पत्र व्यवहार केला असुन संबंधित अधिकारी वर्ग गांभीर्याने घेत नसल्याने जिल्हा अधिकारी अहमदनगर यांच्या दालनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अचानक ठिय्या आंदोलन करण्यात आले.
नगर-पुणे महामार्गांवर अपघातांची चाललेली जीवघेणी मालिका हे प्रशासणाचे नाकर्तेपणाचे लक्षण आहे. वेळोवेळी विविध आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासणाचे लक्ष मनसेच्या वतीने वेधण्यात आले परंतु महामार्गावर अनेक परीवार अर्धवट व निकृष्ठ दर्जांच्या कामामुळे उघड्यावर आले. त्यामुळे न्याय मागण्यासाठी जिल्हाधिकार्यांच्या दालनात बसावे लागले. जिल्हाधिका-यांनी दखल घेतली परंतु काम सुरु होत नाही तोपर्यंत लढत राहणार कुणाचेही रक्त रस्त्यावर सांडू देणार नाही.
-अविनाश पवार, मनसे नेते.
जो पर्यंत संबंधित अधिकारी यांच्या वर गुन्हा दाखल होऊन म्हसणे फाटा टोलनाका बंद करण्यात येणार नाही तोपर्यंत जिल्हा अधिकारी यांच्या दालणात बसणार अशी आक्रमक भुमिका अविनाश पवार यांनी घेतली असता उपजिल्हा अधिकारी राजेंद्र पाटील यांनी सकारात्मक चर्चा करत संबंधित अधिकारी व कंपनी वर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
जिल्हाअधिकारी यांच्या आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले. संबंधित टोलनाका बंद केला नाही तर परत पंधरा दिवसांनंतर अशाच प्रकारे कोणत्याही प्रकारची पुर्व सुचना न देता जिल्हाधिकारी यांच्या दालणात आंदोलनास बसणार असल्याचे मनसे माथाडी कामगार सेना अहमदनगर जिल्हाध्यक्ष अविनाश पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
COMMENTS