मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गावात येऊनही शेतकर्यांना सोडले वार्यावर पारनेर | नगर सह्याद्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गावात येवूनही पारनेर तालु...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गावात येऊनही शेतकर्यांना सोडले वार्यावर
पारनेर | नगर सह्याद्री
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गावात येवूनही पारनेर तालुयातील वनकुटे गावच्या शेतकर्यांच्या समस्या अद्यापही संपलेल्या दिसत नाहीत. पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई तर अद्याप मिळालेली नाहीच पण विजेचा खेळखंडोबाही शेतकर्यांच्या असलेल्या पिकांचे नुकसान करत आहे. साधारण एक महिन्यापासून शेतकर्यांना दिलासा मिळालेला नसल्याने अखेर खडकवाडी विद्युत उपकेंद्रावरील अधिकार्यांना वनकुटे गावच्या शेतकर्यांनी घेराव घालून विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. शेतकर्यांच्या प्रश्नांच्या भडीमाराने आणि सरबत्तीने अधिकारी गांगारून गेले. शेतकर्यांनी केलेल्या अनेक प्रश्नांनी अधिकार्यांची भंबेरी उडाली. अखेर वरीष्ठ अधिकार्यांनी शेतकर्यांच्या मागण्या मान्य केल्या आणि आंदोलन यशस्वीरीत्या संपले.
साधारण एक महिन्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वनकुटे गावात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करुन गेले. तरीही कोणत्याही शेतकर्याला अद्यापही दिलासा मिळालेला नाही आणि मदतही मिळाली नाही. त्यावेळी आलेल्या वादळाने विजेचाही खेळखंडोबा झाला होता. मुख्यमंत्र्यांसमवेत आलेल्या अधिकार्यांनी तात्काळ सर्व सुरळीत होईल असे सांगितले होते परंतु काहीही सुरळीत झालेले दिसत नाही.
विजेचा लपंडाव असाच चालला तर आहे ती पिक आणि जनावरांचा चारा पण हाती लागणार नाही या भितीने शेतकरी हवालदील झालेले आहेत.अजूनही विद्युत वितरण कंपनीने विजेचा प्रश्न व्यवस्थित सोडविला नाही आणि गावातील काही भाग अंधारात आहे. शेतकर्यांना पण कमी दाबाने विज पुरवठा होत आहे. तसेच गावातील पाणीपुरवठा पण त्यामुळे विस्कळीत झालेला आहे. तसेच गावातील लाईनमन तुषार शिंदे यांचा पण विद्युत लाइनवर काम करत असताना अपघात झालेला असून ते पुणे येथे उपचार घेत आहे.
त्यामुळे वनकुटे ग्रामस्थांनी पूर्णवेळ लाईनमन मिळावा, शेतकर्यांना पुर्ण दाबाने विज वितरित व्हावी तसेच विविध मागण्यांसाठी खडकवाडी येथील विद्युत उपकेंद्रावर अधिकार्यांना घेराव घालून आंदोलन केले. आंदोलनाच्या दणयाने अखेर विज वितरण कंपनीचे अधिकारी यांनी शेतकर्यांच्या मागण्या मान्य केल्या व शेतकर्यांना दिलासा भेटेल असे आश्वासन दिले.
यावेळी माजी सरपंच राहुल झावरे, दिपक गुंजाळ, आदिनाथ ढवळे, दिपक खामकर, नारायण गागरे, बबन काळे, किरण शिंदे, दत्तू व्यवहारे, बाळासाहेब खामकर, गणेश खामकर, रामा साळवे, दादाभाऊ वाळूंज, पोपट डुकरे, निलेश औटी, पप्पू गिरी, विकास गागरे, बाळासाहेब बर्डे, योगेश गागरे, वसंत गागरे, माधव शेवंते, संदीप औटी यांसह वनकुटे गावातील अनेक शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
COMMENTS