नागपूर नगर सह्याद्री : आपल्याला जर राजकारणात यश संपादन करायचे असेल तर आपण पूर्ण राजकारण न करता समाजकारण जास्त केले तर राजकीय क्षेत्रात मोठ...
नागपूर नगर सह्याद्री :
आपल्याला जर राजकारणात यश संपादन करायचे असेल तर आपण पूर्ण राजकारण न करता समाजकारण जास्त केले तर राजकीय क्षेत्रात मोठे यश मिळवू शकतो. राजकीय क्षेत्रात काम करताना ८० टक्के समाजकारण करावे, समाजकारण केले तर राजकारण करण्याची गरज बिलकुल पडणार नाही, समाजातील गोरगरीब, अन्यायग्रस्त आणि अपंगांसाठी काम केले तर आपल्याला आनंद मिळत असतो. ज्यांच्यासाठी आपण काम करतो त्याचे आशीर्वाद मिळाले तर आपले जीवन सुखकर होत असते, त्यामुळे राजकारण करताना नुसते राजकारण न करता समाजकारणाकडे जास्त लक्ष द्या, असे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी मौलिक सल्ला दिला
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय वयोश्री योजनेतंर्गत नागपूर ग्रामीण क्षेत्रातील अपंगांना गडकरी यांच्या हस्ते साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या योजनेतंर्गत केवळ नागपूर जिल्ह्यातील अपंगाना नि:शुल्क साहित्य उपलब्ध करून त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी आतापर्यंत ५० हजारपेक्षा अधिक साहित्य वाटप करण्यात आले आहे.
COMMENTS