पंजाब । नगर सह्याद्री - पंजाबमधील गडशंकर येथे काल रात्री अपघात झाला भरधाव ट्रकनं 8 भाविकांना चिरडले आहे. अपघातात आठ भाविकांचा मृत्यू झाला आ...
पंजाब । नगर सह्याद्री -
पंजाबमधील गडशंकर येथे काल रात्री अपघात झाला भरधाव ट्रकनं 8 भाविकांना चिरडले आहे. अपघातात आठ भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहे. बुधवारी रात्री उशिरा सुमारे 50 भाविक बैसाखी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी चरण छो गंगेच्या दिशेने चालले होते.
यावेळी भरधाव वेगात आलेल्या ट्रकने त्यांना चिरडले. या अपघातात पाच भाविकांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, पाच भाविक एकाच कुटुंबातील असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व मृत भाविक उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथील आहे.
अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. विशेष म्हणजे बुधवारीच पंजाबमधील गडशंकर भागातील गढ़ी मानोस्वालजवळ ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी होऊन तीन जणांचा मृत्यू झाला होता. तर 10 जण जखमी झाले होते. गडशंकर उपविभागातील श्री खुरालगड साहिब येथे बैसाखीनिमित्त लंगरचे आयोजन करण्यासाठी जात असताना ही घटना घडली आहे.
गंधाशंकरच्या रस्त्यांची अवस्था चांगली नसल्यामुळे रस्ते अपघातात वाढ होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. रस्त्याची अनेक दिवसांपासून दुरुस्ती झालेली नाही. एक तर रस्त्याची अवस्था बिकट आहे आणि दुसरे म्हणजे रस्त्यावरील तीव्र वळणे आणि चढ-उतार यामुळे वाहनचालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटते आणि वाहने पलटी होतात, असे लोकांचे म्हणणे आहे.
COMMENTS