शिर्डी । नगर सह्याद्री - बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री याने आता साईबाबांविषयी वादग्रस्त वक्तव्यनंतर बाळासाहेब थोरात यांनी द...
शिर्डी । नगर सह्याद्री -
बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री याने आता साईबाबांविषयी वादग्रस्त वक्तव्यनंतर बाळासाहेब थोरात यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. धीरेंद्र शास्त्रीच्या विधानाचा शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्तांनी निषेध केला आहे. यानंतर आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील त्याच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे.
महाविकास आघाडीचे नेते बाळासाहेब थोरात हे शिर्डीहून समृद्धी महामार्गाने वज्रमुठ सभेसाठी संभाजीनगरकडे रवाना झाले आहे. तत्पूर्वी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना थोरातांनी राज्यातील विविध मुद्द्यावर भाष्य केले आहे.
बाळासाहेब थोरात म्हणाले, 'सध्या नवनवीन महाराज तयार होत आहे. सरकार त्यांना संरक्षण देतंय. हा देश बंधूभावाने चालवायचा की दंगलीने भरलेला करायचा असं वाटून जाणार हे सगळं वातावरण आहे.
बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले, 'तथाकथित नवीन महाराज तयार होतात. त्यातीलच हे बागेश्वर महाराज आहेत. धीरेंद्र शास्त्रीने संत तुकारामांनंतर आता साईहबाबांबद्दल वक्तव्य केले आहे. साईबाबांबद्दलचे त्याचे वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे'.
'आपल्या श्रद्धास्थानांवर आघात करण्याचा हा प्रयत्न असून संतांवर आघात करणे हाच सनातनी धर्म आहे का? असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केलाय.. तर नवीन निर्माण झालेली आणि द्वेष पसरवणारी ही मंडळी असून सरकारचं या गोष्टींना प्रोत्साहन असल्यासारखे दिसते आहे. अशी टीका थोरात यांनी केली.
'ही सगळी मंडळी द्वेष पसरवणारी आणि वर्णभेद निर्माण करणारी आहे.. यांचा बंदोबस्त सरकार करत नसेल तर लोकांनी यांचा बंदोबस्त केला पाहिजे, अशा शब्दात बाळासाहेब थोरात यांनी धीरेंद्र शास्त्री आणि कालीचरण महाराज यांचा समाचार घेतला आहे.
COMMENTS