मुंबई। नगर सहयाद्री - शेतकरी राजा आधीच बाजारभावाने त्रस्त झाला असून अवकाळी पावसाने पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.गेल्या काही दिवसांपासून महा...
मुंबई। नगर सहयाद्री -
शेतकरी राजा आधीच बाजारभावाने त्रस्त झाला असून अवकाळी पावसाने पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सातत्याने हवामानत बदल जाणवत आहेत. कुठे ऊन तर कुठे पावसाचं वातावरण आहे. अशा हवामानामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. एवढेच नाही तर बदलत्या हवामानाचा परिणाम आता पिकांवर होत आहे त्यातच आता राज्यात पुन्हा वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याचा अंदाजानुसार, आज (मंगळवार) संपूर्ण दिल्ली, एनसीआर आणि गन्नौर, रोहतक, भिवानी (हरियाणा) बरौत, शिकारपूर, खुर्जा (उत्तर प्रदेश) आणि लगतच्या भागात हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. याशिवाय किठोर, गढमुक्तेश्वर, हापूर, सियाना, शिकोहाबाद, बुलंदशहर, अनूपशहर, नरोरा, जत्री, अलीगढ, कासगंज, रोहतक, खुर्जामध्ये पुढील काही तासांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
राज्यात मार्चमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने आधीच हैराण झालेला शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. त्यातच आता पुन्हा एकदा वातावरणातील बदलांमुळे शेतकऱ्यांवरअवकाळी पावसाच मोठं संकट निर्माण झालं आहे. हवामान विभागाने राज्यात 7,8 आणि 9 एप्रील रोजी अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे.
अहमदनगर, परभणी,बुलढाणा,लातूर, धाराशीव, नांदेड,अकोला,अमरावती, वर्धा आणि नागपूर संभाजीनगर,जालना, जळगाव,या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये 7 ते 9 एप्रीलदरम्यान वादळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
COMMENTS