स्कायमेटचा अंदाज | महाराष्ट्रात जुलै-ऑगस्ट महिन्यात कमी पाऊस मुंबई | वृत्तसंस्था - अवकाळी पावसाने आधीच कंबरडे मोडलेल्या शेतकर्यांना चिंते...
स्कायमेटचा अंदाज | महाराष्ट्रात जुलै-ऑगस्ट महिन्यात कमी पाऊस
मुंबई | वृत्तसंस्था -
अवकाळी पावसाने आधीच कंबरडे मोडलेल्या शेतकर्यांना चिंतेत टाकणारी बातमी समोर आली आहे. देशात यावर्षी अस्मानी संकटाचा इशारा देण्यात आला आहे. यावर्षी देशात सरासरीपेक्षा पाऊसमान कमी राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. स्कायमेट या खासगी संस्थेचा यंदाचा मान्सूनबद्दलच्या अंदाज व्यक्त केला आहे. स्कायमेटकडून यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत ९४ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
स्कायमेट या खासगी संस्थेच्या मान्सूनबद्दलच्या प्राथमिक अंदाजानुसार देशात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत पाऊस ८५८.६ मिमी सरासरी राहण्याची शयता आहे. देशाच्या उत्तर आणि मध्य भागात पावसाची तूट बघायला मिळण्याचा अंदाज आहे. गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात जुलै आणि ऑगस्ट या मुख्य मान्सून महिन्यांत कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि उत्तर भारतातील काही भागात ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शयता आहे.
या प्राथमिक अंदाजानंतर स्कायमेट पुन्हा मान्सूनचा अंदाज देणार आहे. मात्र हा प्राथमिक अंदाज देशभरातल्या शेतकर्यांच्या चिंता वाढल्या आहेत. देशाच्या काही भागांमध्ये कमी पावसाची शयता आहे. हे भाग कुठले आहेत याबद्दल पुढच्या अंदाजात चित्र स्पष्ट होईल, असं स्कायमेटनं म्हटलं आहे.
एल निनोचा परिणाम मान्सूनवर होण्याचं भाकित अमेरिकेच्या हवामान संस्थेनं केलं होते. आता स्कायमेटने देखील पाऊस कमी पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. भारतीय हवामान विभाग आपला अंदाज १५ एप्रिलला वर्तवेल. त्यावेळी एल निनो असेल तर त्याची माहिती समोर येईल. एका अहवालानुसार भारतानं २००२, २००४, २००९ आणि २०१२ या वीस वर्षांत जे काही दुष्काळ पाहिले ते एल निनोमुळेच आले. त्यामुळं पावसावर अवलंबून असणार्या खरीप आणि रबी पिकांच्या उत्पादनात घट निर्माण होण्याची शयता नाकारता येत नाही. यासाठी आत्ताच सावध होऊन सरकारनं उपाययोजना करणं महत्त्वाचं आहे.
COMMENTS