शिर्डी | नगर सह्याद्री धिरेंद्र कृष्ण शास्त्रींनी साईबाबांच्या संदर्भात केलेल्या वतव्याचा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तिव्र शब्दात नि...
शिर्डी | नगर सह्याद्री
धिरेंद्र कृष्ण शास्त्रींनी साईबाबांच्या संदर्भात केलेल्या वतव्याचा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तिव्र शब्दात निषेध केला आहे. धर्माचा काय प्रचार करायचा तो जरुर करा परंतू दुसर्याचा अवमान करण्याचा आधिकार तुम्हाला नाही, अशा शब्दात त्यांनी माध्यमांशी बोलताना धिरेंद्र कृष्ण शास्त्रींना खडेबोल सुनावले.
या वादग्रस्त विधानावर आपली भावना व्यत करताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, धिरेंद्र कृष्ण शास्त्रींकडून यापुर्वी अशी वादग्रस्त विधानं झाली आहेत. अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे आव्हान स्विकारायला ते तयार नाहीत याकडे लक्ष वेधून साईबाबांबद्दल अशा पध्दतीची नेहमीच वादग्रस्त विधानं करुन, बुध्दीभेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे धार्मिक आणि सामाजिक तेढही निर्माण होते. अशा बाबा लोकांची वतव्य ही केवळ सवंग लोकप्रियतेचे एक थोतांड असल्याची संतप्त प्रतिक्रीया त्यांनी व्यत केली. साईबाबांनी आपल्या संपुर्ण वाटचालीत माणसांमध्ये देव पाहिला. म्हणूनच साईबाबांचा सबका मालिक एक असे आपण म्हणतो. श्रध्दा आणि सबुरीचा महामंत्र त्यांनी विश्वाला दिला. त्या आधारेच आज संपूर्ण विश्वाची वाटचाल सुरु आहे, लाखो भतांचे ते श्रध्दास्थान आहेत. कुणाच्या श्रध्देवर चिखलफेक करण्याचा कोणालाही आधिकार नाही, अशा शब्दात धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या वतव्याचा त्यांनी समाचार घेतला.महाराष्ट्र संताची भूमी आहे, संतानीच हा समाज उभा करण्याचे मोठे काम केले. त्यांच्यामध्येच आम्ही देव बघतो. परंतू या संताप्रतीच असणा-या श्रध्देला कोणी अवमानीत करीत असेल तर ते कदापीही आम्ही सहन करणार नाही. धर्माचा काय प्रचार करायचा तो करा परंतू दुस-याचा अवमान करण्याचा आधिकार तुम्हाला नाही, अशा परखड शब्दात धिरेंद्र शास्त्रींच्या वतव्यावर मंत्री विखे पाटील यांनी टिका केली.
छत्रपती संभाजी नगर येथील महाविकास आघाडीच्या सभेवर भाष्य करताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, मुळातच महाविकास आघाडीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. कोणाचाही एकमेकांवर विश्वास राहिलेला नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संदर्भातील वतव्यानंतर हे दिसून आले आहे. शिवसेनेने विचारांशीच फारकत केल्यामुळे त्यांनी अस्तित्व गमावले आहे. काँग्रेसला स्वत:च्या अस्तित्वासाठी धडपड करावी लागत आहे आणि दोन्हीही पक्षांचा उपयोग करुन, राष्ट्रवादी काँग्रेस फत आपली राजकीय पोळी भाजून घेण्याच्या प्रयत्नात दिसते त्यामुळेच या सभेला वज्रमुठ नाव असले तरी, भविष्यात हेच एकमेकांवर मुठ उगारतील, यांच्या वज्रमुठीकडे आणि उभ्या केलेल्या या तमाशाकडे कोणीही लक्ष देणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर लोकांचा विश्वास आहे. पुढील सर्वच निवडणूकांमध्ये भाजप शिवसेनाच सत्तेवर दिसेल असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यत केला.
COMMENTS