पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुयातील खडकवाडी, पळशी, वनकुटे, तास, भुलदरा, वडगाव सावताळ, ढवळपुरी गाजदीपुर येथे सलग तीन दिवस अवकाळी पावसासह...
पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर तालुयातील खडकवाडी, पळशी, वनकुटे, तास, भुलदरा, वडगाव सावताळ, ढवळपुरी गाजदीपुर येथे सलग तीन दिवस अवकाळी पावसासह गारपिटीने शेतकर्यांच्या शेतीमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामध्ये कलिंगड, खरबूज, टोमॅटो, कांदा व झेंडू पिकांसह फळबागा हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला आहे.त्यामुळे एकीकडे शेतीमालाला भाव नसल्याने व दुसरीकडे अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. तर दुसरीकडे हातातोंडाशी आलेला घास नैसर्गिक आपत्तीने हिरावून घेतला असून महसूल व कृषी विभागाच्या अधिकार्यांना सोयर सुतक नसल्याचे दिसून आले आहे. दुसरीकडे या अवकाळी पावसाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.
शेतकर्यांना तातडीने मदत घ्यावी ः शेतकरी
सगेल्या दोन ते तीन दिवसाच्या काळात खडकवाडी, कामटवाडी परिसराला वादळी वार्यासह गारपीटीचा मोठा फटका बसला असून यामध्ये रब्बी हंगामातील शेतीमालाचे मोठे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे अतिवृष्टीचे अनुदान अद्यापही अनेक शेतकर्यांना मिळाले नसून दोन दिवसात या शेतीमालाच्या नुकसानीचे पंचनामे करून जागेवर आर्थिक मदत सरकारने द्यावी अशी मागणी प्रगतशील शेतकरी कारभारी आहेर, एल.आर. शिंदे यांनी केली आहे.
गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी महसूल विभागाने त्वरित करून पंचनामे करावी अशीही मागणी आमदार नीलेश लंके यांनी जिल्हाधिकारी सिध्दीराम सालीमठ यांच्याकडे सोमवारी केली आहे. रविवारी सायंकाळी ६ वाजता आमदार लंके यांनी सांगली दौरा आटोपून पहाटे तालुयात येताच सोमवारी सकाळी ६.१५ शेताच्या बांधावर जात नुकसानीची पाहणी केली. तालुयातील वनकुटे, पळशी तसेच खडकवाडी येथे वादळी वारा, गारपिटीसह झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतांमधील उभ्या पिकांसह घरांची मोठया प्रमाणावर पडझड व अनेक घरांचे पत्रे पण उडालेले आहे.
खासदारांनी तरी गारपीटग्रस्त भागाचा दौरा करणे अपेक्षित होते..
सध्या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अयोध्या दौर्यावर असून अनेक मंत्रिमंडळातील मंत्री या दौर्यात सहभागी झालेले आहे. त्यामुळे शनिवारी भाजपचे खासदार सुजय विखे पाटील हे पारनेर दौर्यावर होते. शुक्रवारी व शनिवारी खडकवाडी, कामटवाडी, पळशी परिसरात मोठ्या प्रमाणावर गारपीट होऊन शेतीमालाची नुकसान झाले होते. त्यामुळे किमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी नुकसान ग्रस्त भागाचा दौरा करून महसूल, कृषी यंत्रणाला संयुक्त पंचनामा करण्याचे आदेश दिले असते तर बरे झाले असते अशी प्रतिक्रिया खडकवाडी उपस्थितीत शेतकर्यांनी व्यक्त केली आहे.
रविवारी सायंकाळी सांगलीच्या विटा, खानापुर येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीस आ. लंके यांनी हजेरी लावली होती. तेथून सोमवारी पहाटे साडेपाच वाजता हंगे येथे पोहचल्यांनतर चालकास सोडून दुसर्या चालकासोबत आ. लंके यांनी थेट वनकुटे गाठले. सव्वा सहाच्या सुमारास त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यास सुरूवात केली. वनकुट्यात भागाराम पायमोडे या शेतकर्याचे चार एकर कांद्याच्या पिकाचा गारपिटीमुळे अक्षरशः चिखल झाला. आ. लंके यांनी भेट घेतल्यानंतर वयोवृध्द पायमोडे यांना आश्रू अनावर झाले. गेल्या शंभर वर्षात असे संकट आले नव्हते अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. आ. लंके यांनी पायमोडे यांना धिर देत शासनाची मदत मिळवून देण्यासाठी मी पुढाकार घेत असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
महसूल व पालकमंत्र्यांकडून अपेक्षाभंग
सध्याचे सरकार शेतकर्यांच्या प्रश्नावर उदासिन आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी कीतीही दौरे करावेत, देवदर्शन करावे त्यावर आपली काहीही तक्रार नाही. परंतू हे करीत असताना त्यांनी शेतकर्यांकडेही पहावे. सरकार शेतकर्यांकडे लक्ष देण्यास तयार नाही. ते कीती दिवस धुळफेक करणार आहेत? किती दिवस फसवणार आहेत? महसूलमंत्री, पालकमंत्री मोठी माणसे आहेत. त्यांच्याकडून अपेक्षा होती. मात्र ते देखील शेतकर्यांकडे लक्ष देत नाहीत ही खेदाची बाब आहे असेही आमदार नीलेश लंके म्हणाले.
वनकुट्यातील साहेबराव बाचकर यांच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने त्यांचा संसार उघडयावर आला. त्यांची मुलगी राणी हिच्या पायावर दगड पडून ती जखमी झाली. आ.लंके यांनी राणी हिची विचारपूस करून तिच्यावर उपचार करण्याच्या सुचना दिल्या. बाळासाहेब खामकर यांच्या घरापुढील टपरी उडून शेजारच्या शेतात जाऊन पडली. त्यात एक गाय जखमी झाली. बबन मुसळे यांच्या घरावरील पत्रे उडाल्याने संसारऊपयोगी साहित्याचे नुकसान झाले. पत्रे उडाल्यानंतर दगड पडल्याने ७१ वर्षीय बबन मुसळे यांच्या खांद्याला जखम झाली.
नुकसान भरपाईसाठी आमदार नीलेश लंके आक्रमक
अवकाळी पावसाने पारनेर तालुयातील वनकुटे, पळशी, खडकवाडी क्षेत्रातील अनेक गावांमध्ये गारपीट व अतिवृष्टीने अचानक धुमाकूळ घातला. यात अनेक शेतकर्यांचे, नागरिकांचे मोठे नुकसान झालेले आहे तरी या सर्व नुकसानीचे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच या बाबत आमदार नीलेश लंके यांनी संबंधित अधिकार्यांशी संपर्क साधून नुकसान ग्रस्तांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी अस्मानी सुलतानी संकटात सापडला आहे. अनेक ठिकाणी घरांचे छते कोसळल्या तर अन्य काही नुकसान झाल्याच्या घटना आहेत. या सर्व नुकसानीचे पंचनामे संबंध अधिकार्यांनी तातडीने करून सर्व नुकसानग्रस्त शेतकर्यांना, नागरिकांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे अशा सूचना आमदार नीलेश लंके यांनी संबंधित अधिकार्यांना दिल्या आहेत.
गोरक्षनाथ गायकवाड यांना घरकुल योजनेअंतर्गत घर मंजुर झाले असून त्याचे सुरू असलेले बांधकाम पाउस तसेच गारपीटीमुळे जमीनदोस्त झाले. त्याचीही आ. लंके यांनी पाहणी केली. पळशी येथील मोहन शिंदे यांची विटभट्टी तसेच कामगारांच्या घरांचे गारपिटीने नुकसान झाले. प्रविण गागरे यांच्या गोठयावरील पत्रे उडाल्याने तेथील जनावरे रात्रभर उघडयावरच होती. विट भट्टीवरील पुनाजी बर्डे यांनी आ. लंके यांच्याशी संवाद साधताना आमच्या पोटाची खळगी कशी भरायची असा सवाल करीत मदतीची याचना केली. खडकवाडी येेथील टोमॅटो, कांदा पिकाच्या झालेल्या नुकसानीचीही आ. लंके यांनी पाहणी केली.
आ. लंके यांच्या समवेत अॅड. राहुल झावरे, सरपंच प्रकाश राठोड, अप्पासाहेब शिंदे, श्रीरंग रोकडे, डॉ. रावसाहेब आग्रे, आदीनाथ ढवळे, अर्जुन कुलकर्णी, योगेश शिंदे, रवि ढोकळे, गणेश मधे, अमोल डूकरे, बाळासाहेब खामकर, रामा साळवे, प्रविण गागरे, संकलेश मोढवे आदी यावेळी उपस्थित होते.
COMMENTS