अहमदनगर | नगर सह्याद्री सहाय्यक कामगार आयुक्त तथा माथाडी मंडळाचे अध्यक्ष यांच्या लेखी आश्वासनानंतर दि.१७ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासम...
अहमदनगर | नगर सह्याद्री
सहाय्यक कामगार आयुक्त तथा माथाडी मंडळाचे अध्यक्ष यांच्या लेखी आश्वासनानंतर दि.१७ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रेल्वे माल धक्क्यावरील दरवाढ प्रश्नावरून सुरू असणारे कामगारांचे आंदोलन स्थगित करण्यात आले होते. यावेळी एक महिन्याच्या आत दरवाढ निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. जर हे आश्वासन विहित मुदतीत पूर्ण केले गेले नाही, तर पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिला आहे. तसेच कामगारांना त्यांच्या हक्काचा आणि घामाचा मेहनताना असणार सुमारे रु. ३ ते ४ कोटींचा दरवाढीसह फरक मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत लढणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
काळे यांच्या नेतृत्वाखाली माल धक्क्यावरील माथाडी कामगारांच्या शिष्टमंडळाने सहाय्यक कामगार आयुक्त व माथाडी बोर्डाचे अध्यक्ष नितीन कवले यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन मुदतीत आश्वासनाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात प्रदीर्घ चर्चा केली. यावेळी कामगार प्रतिनिधी विलास उबाळे, सुनील भिंगारदिवे, रोहिदास भालेराव, दिपक काकडे, बाबासाहेब वैरागर, अमर डाके आदी उपस्थित होते.
काळे म्हणाले की, यापूर्वी देखील मागील दोन वर्षांच्या कालावधीमध्ये वारंवार आश्वासन देण्यात आली आहेत. मात्र त्यांची पूर्तता करण्यात आलेली नाही.विलास उबाळे, सुनिल भिंगारदिवे म्हणाले की, माथाडी कामगार हा अतोनात कष्ट करतो.हे काम अत्यंत कष्टप्रद स्वरूपाच आहे.
मात्र दुर्दैवाने घामाचा योग्य मोबदला मिळत नाही. कोट्यावधी रुपयांचा फरक मिळवून देण्यासाठी निर्णायक लढाई छेडण्यात आली आहे. कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठीे आंदोलन छेडण्यात येणार आहे.
COMMENTS