मुंबई । नगर सह्याद्री - राज्यात अवकाळी पावसाचे संकट उभे ठाकले आहे. आजपासून १८ मार्चपर्यंत मराठवाडा, विदर्भ, दक्षिण कोकणात विजांच्या गडगडाटा...
मुंबई । नगर सह्याद्री -
राज्यात अवकाळी पावसाचे संकट उभे ठाकले आहे. आजपासून १८ मार्चपर्यंत मराठवाडा, विदर्भ, दक्षिण कोकणात विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. या भागात गारपीट होण्याची शयता आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण असून हलया सरी कोसळत आहेत. संपूर्ण मराठवाड्यात असेच वातावरण आहे. मंगळवारी देखील नाशिक जिल्ह्यात विविध ठिकाणी अवकाळी पाऊस झाल्याने कांदा व द्राक्ष उत्पादकांमध्ये चिंता वाढली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार विदर्भात गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, मराठवाड्यात उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, नांदेड तसेच मध्य महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक जिल्ह्यात अधिक पावसाची शयता आहे.
१६ मार्चला गुरुवारी राज्यात सर्वदूर पाऊस होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुणे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये विजांच्या
कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. देशाच्या मध्यवर्ती भूभागात पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकणारा हवेच्या कमी दाबाचा आस व पूर्वेकडून पश्चिमेकडे तसेच बंगालचा उपसागर व आग्नेयेकडून येणार्या आर्द्रतायुक्त वार्यांच्या मिश्रणातून अवकाळी पाऊस पडत असल्याची माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
COMMENTS