रत्नागिरी । नगर सह्याद्री - राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. यामध्ये यामध्ये पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या अपघाती मृत्यूचा खु...
रत्नागिरी । नगर सह्याद्री -
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. यामध्ये यामध्ये पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या अपघाती मृत्यूचा खुलासा केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील 'महानगरी टाईम्स' वृत्तपत्राचे पत्रकार शशिकांत वारिसे यांचा मंगळवारी (7 फेब्रुवारी) अपघाती मृत्यू झाला होता.मात्र त्यांचा अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता. याबद्दलच्या तपास सुरू असतानाही अनेक संशयास्पद बाबी आढळून आल्या होत्या.
याबद्दल विधिमंडळ अधिवेशनात महत्वाचा खुलासा झाला असून शशिकांत वारिसे यांची जाणीवपूर्वक अपघात घडवून आणल्याची कबुली राज्य सरकारने दिली आहे.
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या यांच्या मृत्यूच कारण उलगडले आहे. शशिकांत वारिशे यांच्या अपघाती मृत्यूबद्दल विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नावर राज्य सरकारने लेखी उत्तर दिले आहे. ज्यामध्ये शशिकांत वारिशे यांची जाणीवपूर्वक नाणार परिसरात वाहन अपघात घडवून आणला, असे राज्य सरकारने विरोधकांच्या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरामध्ये म्हटले आहे. तसंच सध्या या प्रकरणाची एसआयटी चौकशी सुरू असल्याची माहितीही दिली आहे.
राजापूर येथे ठिकाणी पेट्रोल पंपावर 'थार' गाडीने शशिकांत वारिसे यांच्या दुचाकी वाहनाला जोरात धडक दिली होती. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. यापूर्वी या प्रकरणातला आरोपी पंढरीनाथ आंबेरकर यानेही वारिशेंवरचा हल्ला पूर्वनियोजित असल्याची कबुली दिली होती.
COMMENTS