गटेवाडीत कन्हैया अॅग्रोच्या प्रकल्पाचे उपमुख्यमंत्री फडणवीस, हजारे यांच्या हस्ते उद्घाटन पारनेर | नगर सह्याद्री कन्हैया अॅग्रोने पारनेरसार...
गटेवाडीत कन्हैया अॅग्रोच्या प्रकल्पाचे उपमुख्यमंत्री फडणवीस, हजारे यांच्या हस्ते उद्घाटन
पारनेर | नगर सह्याद्रीकन्हैया अॅग्रोने पारनेरसारख्या ग्रामीण भागात दूध धंद्याच्या माध्यमातून धवल क्रांती केली असून पशुखाद्य उत्पादनातही भरारी घेतली आहे. कन्हैया अॅग्रोने महाराष्ट्रात दर्जा टिकवण्याचे काम केले असून दर्जेदार उत्पादनाचा ठसा महाराष्ट्रात निर्माण केल्याचे गौरवोद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गटेवाडीत केले. शेतीमधून दर्जेदार उत्पादनासाठी राज्यात २५ लाख हेटर क्षेत्रावर नैसर्गिक शेतीचा नवीन प्रयोग राज्य सरकार राबविणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. शेतकर्यांसाठी नवीन तंत्रज्ञान व योजना राबविण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून कन्हैया अग्रोने दर्जेदार उत्पादनाचा ठसा पुढील काळातील कायम ठेवावा असे आवाहन फडणवीस यांनी केले.
पारनेर तालुयातील कन्हैया अॅग्रोच्या गटेवाडी येथील नुतन प्रकल्पाचे शनिवारी (दि. ११) दुपारी १ वाजता उपमुख्यमंत्री फडणवीस, पद्मभूषण अण्णा हजारे, आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले. शांताराम लंके, अमुल डेअरीचे बाळासाहेब भोसले, उद्योजक मच्छिंद्र लंके, सुरेश पठारे, अभय औटी, लिबेश नायर, विठ्ठल पवार, नितीन आडसुळ, जिल्हाधिकारी सिद्धीराम सालीमठ, राहुल शिंदे, अश्विनी थोरात, विश्वनाथ कोरडे, तालुकाध्यक्ष वसंतराव चेडे, बाळासाहेब नरसाळे आदी यावेळी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कन्हैया अॅग्रोने एक विस्तारीत प्रकल्पाचे लोकार्पण करून दमदार पाऊल टाकले आहे. सुरेश पठारे मेहनती असून लंके कुटुंबियांच्या अनुभवाचा फायदा महाराष्ट्रातील शेतकर्यांना होणार आहे. शेतकर्यांना पशुधनाच्या माध्यमातून स्थैर्य मिळते. शेतीला मदतीचे काम पशुधन करते. दुधाची वाढती मागणी व दूध जनावरांना अधिक पोषक आहार देऊन दूध क्षमता वाढवणे आवश्यक आहे. जंगलात पुरेसा चारा उपलब्ध होत नाही. जनावरांना पोषक द्रव्ये देण्याचे काम कन्हैया अॅग्रो करत आहेत. आज अनेक कंपन्या बोगस उत्पादने करतात. पशुधनाशिवाय आपल्याला पर्याय नाही. जग व शेती वाचवायचे असेल तर २५ लाख हेटर क्षेत्रावर नैसर्गिक शेती नवीन प्रयोग आवश्यक आहेत.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले, कन्हैया अॅग्रोने सुरू केले ते शेतकर्यांसाठी महत्वाचे आहे. ३०० लीटर पासुन ७ हजार लीटर दूध स़ंकलन शेतकर्यांसाठी महत्वाचे आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, शांताराम लंके या उद्योगाचे आधारवड आहेत. एक साधा शेतकरी काय करू शकतो, याचे उदाहरण म्हणजे कन्हैया अॅग्रो व उद्योग समूह आहे. राज्यात साडे तीन कोटी संकलन होते. परंतु पशुखाद्याची निर्मिती होत नाही. पशुखाद्याच्या गुणवत्ताबाबत मोठ्या तक्रारी आहेत. राज्य सरकारपुढे दूध भेसळ व पशुखाद्य भेसळ मोठे आवाहन आहे. कन्हैया अॅग्रो याला अपवाद असून आदर्श काम करत आहेत. हा व्यवसाय सहकाराच्या माध्यमातून चालू होता. परंतु अमुल मदर डेअरीसारखे खासगी प्रकल्प महाराष्ट्रात आल्याने स्पर्धा निर्माण झाली. दूध धंद्यात चांगले दिवस आले. विक्रमी दर सध्या शेतकर्यांना मिळत आहे. सुरेश पठारे म्हणाले, व्यावसायिक पार्श्वभूमी नसताना आम्ही २०१५ साली अहमदनगर जिल्ह्यात असलेला हा आमचा व्यवसाय आज महाराष्ट्राच्या काना कोपर्यात घेऊन गेलो. कारखाना आणि त्यानंतर आज हा प्रकल्प अत्याधुनिक ५० कोटी रुपयांची गुंतवणूक प्रकल्पासाठी करणार आहे. आपल्या कार्यकाळातील एक खिडकी योजनेचा फायदा आम्हाला प्रकल्प उभारण्यास झाला. सादर झालेला अर्थसंकल्प उद्योग धंद्यासाठी महत्वाचा आहे. कन्हैया अॅग्रो ने पशुखाद्यात नवनवीन संशोधन करून उत्पादने निर्माण केले. गटेवाडी येथील प्रकल्पाची २०१७ साली सुरवात झाली. आज प्रतीमहीना ८ हजार मेट्रिक टन उत्पादन होत आहे. नव्याने होणारा प्रकल्प अत्याधुनिक आहे. प्रकल्पामुळे तालुयातील विविध गावातील ६०० कर्मचारी येथे काम करत आहेत. दर्जेदारपणामुळे कन्हैया अॅग्रोच्या पशुखाद्याला मागणी वाढली आहे.
हजारेंककडून उपमुख्यमंत्री फडणवीस
व मंत्री विखे पाटलांवर पुष्पवृष्टी..
पारनेर तालुयातील गटेवाडी येथील कन्हैया अॅग्रोच्या नूतन प्रकल्पाच्या उत्पादन उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर पुष्पवृष्टी केली. सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असतानाही अनेक महिन्यांपासून अण्णांशी फक्त फोनवर बोलणे होते. अण्णांची प्रत्यक्ष भेट झाली नाही. त्यामुळे सुरेश पठारे यांच्या आमंत्रणाचा स्वीकार करत अण्णांना भेटण्यासाठी मी या कार्यक्रमास आलो असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
COMMENTS