अमृत उद्योग समूहाच्या वतीने १३ व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन संगमनेर | नगर सह्याद्री कृषी औद्योगिक क्रांतीतून प्रेरणा घेत सहकाराच्या माध्यम...
अमृत उद्योग समूहाच्या वतीने १३ व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
संगमनेर | नगर सह्याद्रीकृषी औद्योगिक क्रांतीतून प्रेरणा घेत सहकाराच्या माध्यमातून तालुयातील गोरगरीब माणसांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी भाऊसाहेब थोरात यांनी आयुष्यभर काम केले. समाज विकासाच्या अनेक मोहिमा यशस्वी करणारे भाऊसाहेब थोरात हे देव माणूस होते असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे जेष्ठ संचालक मधुकरराव नवले यांनी केले आहे.
अमृत उद्योग समूहाच्या वतीने साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरील प्रेरणास्थळ येथे स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात यांच्या १३ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी अध्यक्षस्थानी डॉ. सुधीर तांबे होते.यावेळी प्रा .हिरालाल पगडाल, कांचनताई थोरात, दुर्गाताई तांबे, माधवराव कानवडे, रणजीतसिंह देशमुख, कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ, अरुण पा. कडू, राजेश मालपाणी, संपतराव डोंगरे ,भाऊसाहेब कुटे, सुधाकर जोशी, शंकर पा. खेमनर, हौशीराम सोनवणे, रामहरी कातोरे ,लहान भाऊ गुंजाळ, आर.बी. रहाणे, सुरेश थोरात, संतोष हासे, राजेंद्र चकोर, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, उपसभापती नवनाथ आरगडे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मधुकरराव नवले म्हणाले की, स्व. भाऊसाहेब थोरात यांनी स्वातंत्र्य चळवळीत योगदान दिल्यानंतर स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सहकार चळवळीचा मार्ग निवडला. त्यांनी आयुष्यभर अनेक योजना राबवल्या. पाण्यासाठी संघर्ष केला. सहकाराबरोबर शिक्षण आणि दुग्ध व्यवसायाची जोड देऊन संगमनेर तालुका समृद्ध बनवला. वयाच्या उत्तरार्धात दंडकारण्य ही अभिनव योजना देशाला दिली. यावेळी हिरालाल पगडाल म्हणाले की,सातत्याने समाजासाठी नवीन काहीतरी करणार्या भाऊसाहेब थोरात यांचे जीवन हे संघर्षमय राहिले. संगमनेर अकोले तालुयाच्या हक्काच्या पाण्यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला. १९८९ मधील या संघर्षामुळेच ३०% पाणी संगमनेर व अकोले तालुयाला मिळाले. यावेळी डॉ. तांबे , रणजीतसिंह देशमुखयांची भाषणे झाली.
यावेळी अमित पंडित, सुहास आहेर, विष्णुपंत रहाटळ, निर्मलाताई गुंजाळ, दत्तात्रय थोरात, प्रा. बाबा खरात, केशवराव जाधव, सोमेश्वर दिवटे, अजय फटांगरे ,गणपतराव सांगळे, अनिल शिंदे, चंद्रकांत कडलग, राजेंद्र कडलग, सुभाष सांगळे, मीनानाथ वरपे यांच्यासह कारखान्याचे सर्व संचालक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ यांनी केले सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांनी आभार मानले.
COMMENTS