नवी दिल्ली । नगर सह्याद्री - देशातील अनेक राज्यांमध्ये H3N2 विषाणूचा धोका वाढला आहे. या विषाणूमुळे देशात आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे...
नवी दिल्ली । नगर सह्याद्री -
देशातील अनेक राज्यांमध्ये H3N2 विषाणूचा धोका वाढला आहे. या विषाणूमुळे देशात आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे.
त्याचबरोबर या विषाणूचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रात झाला आहे. आतापर्यंत येथे विषाणूची 352 प्रकरणे नोंदवली गेली आहे. बीएमसीच्या म्हणण्यानुसार, मुंबईत 32 रुग्ण दाखल आहे. त्यापैकी 4 H3N2 आणि 28 रुग्ण H1N1 चे आहे. या सर्व रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर आहे. राज्यात इन्फ्लूएंझा H3N2 चा धोका लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत उपस्थित राहणार आहे.
महाराष्ट्रात या विषाणूमुळे आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी अहमदनगरमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणारा तरुण गेल्या आठवड्यात मित्रांसोबत फिरायला अलिबागला गेला होता. तेथून परतल्यानंतर त्यांची प्रकृती ढासळली आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत म्हणाले की, H3N2 विषाणूची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार सुरू असून रुग्णालयांना सतर्कतेवर ठेवण्यात आले आहे. H3N2 हा विषाणू जीवघेणा नसून तो उपचाराने बरा होऊ शकतो, त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही, असे ते म्हणाले आहे. H3N2 विषाणूसंदर्भात गुरुवारी बैठक होणार असून त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अहवाल दिला आहे की प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या इन्फ्लूएंझा नमुन्यांपैकी सुमारे 79% मध्ये H3N2 विषाणू आढळले आहेत. यानंतर, इन्फ्लूएन्झा बी व्हिक्टोरिया विषाणू 14% नमुन्यांमध्ये आढळले आहेत आणि इन्फ्लूएंझा A H1N1 विषाणू 7% मध्ये आढळले आहेत. H1N1 ला सामान्य भाषेत स्वाइन फ्लू असेही म्हणतात. मंत्रालयाचे म्हणणे आहे की मार्चच्या अखेरीस H3N2 विषाणूची प्रकरणे कमी होऊ लागतील.
COMMENTS