जालना। नगर सहयाद्री- जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील वडोदबाजार (ता.सिल्लोड) येथील धक्कादायक बातमी समोर अली आहे. मुलीच्या घरी जाण्यासाठी निघाल...
जालना। नगर सहयाद्री-
जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील वडोदबाजार (ता.सिल्लोड) येथील धक्कादायक बातमी समोर अली आहे. मुलीच्या घरी जाण्यासाठी निघालेल्या दाम्पत्यांचा वाटेतच अपघात झाला आहे. अपघातात दोघा पती-पत्नींनी जागेवरच प्राण गमावले आहेत.खामगावकडे वळण घेत असताना क्रुझरने दुचाकीला जबर धडक दिलेल्याने या पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, अपघातात दत्तू वामन बोराडे (वय ६५) व कमलबाई बोराडे (वय ५९ ) हे वृध्द दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली.
आज सकाळी त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते. लेकीने खूपच आग्रह केला तर एखादा दिवस मुक्काम करू अश्या विचाराने मुलीला भेटण्याच्या ओढीने हे दाम्पत्य गावातून मोठ्या आनंदाने निघाले. पण नियतीच्या मनात मात्र काही भलतेच होते. त्यांच्या मुलीला आई वडिलांच्या मृत्यूची बातमीच मिळाल्याने सगळ्या गावावर दुःखाची छाया पसरली आहे.
दुचाकीवर निघालेले हे कुटुंबीय फुलंब्री सिल्लोड रोडवरील खामगाव फाट्यापर्यंत आले आणि त्याच वेळेस पाठीमागून भरधाव आलेल्या क्रुझर जीपने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की क्रुझरच्या धडकेने बोराडे दाम्पत्य दुचाकीवरून दूर फेकल्या गेल्याने गंभीर जखमी झाले. रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांनी ही घटना पाहताच मदतीसाठी धावपळ केली, कुणी तरी तातडीने पोलिसांना अपघाताची माहिती दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून दोघांना मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आणि नातेवाईकांनी मुला मुलींनी एकच आक्रोश केला. याप्रकरणी वडोदबाजार ठाण्यात क्रुझर चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्दैवी घटनेने दगडवाडी गावावर शोककळा पसरली आहे.
COMMENTS